शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

'नितीश सरकार २०२५ पर्यंत टिकणार नाही', चिराग पासवानांचे भाकित

By ravalnath.patil | Updated: November 28, 2020 20:34 IST

Chirag Paswan : लोक जनशक्ती पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त चिराग पासवान यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे.

ठळक मुद्देचिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणूक एनडीएसोबत न लढण्याचा निर्णय का घेतला, याबाबतही भाष्य केले.

पटना : सध्याचे बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. २०२५ च्या आधी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे, असे भाकित लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जमुईचे खासदार चिराग पासवान यांनी केले आहे.

लोक जनशक्ती पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त चिराग पासवान यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. चिराग पासवान म्हणाले, "आपण सर्वांनी आतापासून २४३ विधानसभा मतदारसंघासाठी तयारी सुरू केली पाहिजे, जेणेकरून सर्व जागांवर पार्टी बिहारसाठी आपले व्हिजन ठेवू शकेल. बिहार विधानसभेच्या पुढील निवडणुका २०२५ पूर्वी होऊ शकतात."

नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पार्टीच्या कामगिरीबद्दल चिराग पासवान यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, बिहार विधानसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने पार्टीची कामगिरी होती, त्यावरून पार्टीचा झपाट्याने विस्तार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याचबरोबर, "पार्टीला २४ लाख  मते मिळाली आहेत. यावरून एलजेपीचा विस्तार स्पष्ट होतो. बिहारमध्ये पार्टीने 'बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट'सोबत कोणताही करार केलेला नाही. तसेच, निवडणुकीच्या आधी नवीन लोकांनी पार्टीत प्रवेश केल्यामुळे पार्टी आणखी मजबूत झाली आहे", चिराग पासवान म्हणाले. 

दरम्यान, चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणूक एनडीएसोबत न लढण्याचा निर्णय का घेतला, याबाबतही भाष्य केले. चिराग म्हणाले की, एनडीएमध्ये लोक जनशक्ती पार्टीला केवळ १५ जागा देण्याचे सांगितले जात होते. ते पार्टीच्या संसदीय मंडळाला मान्य नव्हते. या कारणास्तव बहुतांश जागांवर मैत्रीपूर्ण लढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि निवडणुकीत पक्षाने १३५ उमेदवार उभे केले. 

टॅग्स :BiharबिहारLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टी