शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

'नितीश सरकार २०२५ पर्यंत टिकणार नाही', चिराग पासवानांचे भाकित

By ravalnath.patil | Updated: November 28, 2020 20:34 IST

Chirag Paswan : लोक जनशक्ती पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त चिराग पासवान यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे.

ठळक मुद्देचिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणूक एनडीएसोबत न लढण्याचा निर्णय का घेतला, याबाबतही भाष्य केले.

पटना : सध्याचे बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. २०२५ च्या आधी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे, असे भाकित लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जमुईचे खासदार चिराग पासवान यांनी केले आहे.

लोक जनशक्ती पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त चिराग पासवान यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. चिराग पासवान म्हणाले, "आपण सर्वांनी आतापासून २४३ विधानसभा मतदारसंघासाठी तयारी सुरू केली पाहिजे, जेणेकरून सर्व जागांवर पार्टी बिहारसाठी आपले व्हिजन ठेवू शकेल. बिहार विधानसभेच्या पुढील निवडणुका २०२५ पूर्वी होऊ शकतात."

नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पार्टीच्या कामगिरीबद्दल चिराग पासवान यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, बिहार विधानसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने पार्टीची कामगिरी होती, त्यावरून पार्टीचा झपाट्याने विस्तार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याचबरोबर, "पार्टीला २४ लाख  मते मिळाली आहेत. यावरून एलजेपीचा विस्तार स्पष्ट होतो. बिहारमध्ये पार्टीने 'बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट'सोबत कोणताही करार केलेला नाही. तसेच, निवडणुकीच्या आधी नवीन लोकांनी पार्टीत प्रवेश केल्यामुळे पार्टी आणखी मजबूत झाली आहे", चिराग पासवान म्हणाले. 

दरम्यान, चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणूक एनडीएसोबत न लढण्याचा निर्णय का घेतला, याबाबतही भाष्य केले. चिराग म्हणाले की, एनडीएमध्ये लोक जनशक्ती पार्टीला केवळ १५ जागा देण्याचे सांगितले जात होते. ते पार्टीच्या संसदीय मंडळाला मान्य नव्हते. या कारणास्तव बहुतांश जागांवर मैत्रीपूर्ण लढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि निवडणुकीत पक्षाने १३५ उमेदवार उभे केले. 

टॅग्स :BiharबिहारLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टी