शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दररोज नऊ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: April 14, 2016 01:01 IST

परिस्थितीमुळे विवश झालेले महाराष्ट्रातील नऊ शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. मोदी सरकार शेतकऱ्यांबद्दल पूर्णपणे असंवेदनशील बनले आहे. देशातील परिस्थिती काय आहे. सरकारने कृषी

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीपरिस्थितीमुळे विवश झालेले महाराष्ट्रातील नऊ शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. मोदी सरकार शेतकऱ्यांबद्दल पूर्णपणे असंवेदनशील बनले आहे. देशातील परिस्थिती काय आहे. सरकारने कृषी संकटावर मात करण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत, याबद्दल श्वेतपत्र जारी करावे, अशी मागणी काँग्रेसने बुधवारी केली आहे.देशातील दहा राज्ये दुष्काळाच्या खाईत सापडली आहेत. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट असून गंभीर चिंतेची बाब बनली आहे. त्यांचे ऐकून घ्यायला कुणीही नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते मनु अभिषेक सिंघवी यांनी येथे म्हटले. लातूरला रेल्वेने पाणी पोहोचविण्यात आले, मात्र ते उंटाच्या तोंडात जीरे देण्यासारखे आहे. एकट्या लातूरला त्यापेक्षा शंभर पट जास्त हवे असून तरच लोकांची गरज भागू शकेल, असेही ते म्हणाले. दुष्काळ असतानाही मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या मृतदेहांवर राजकारण चालविले आहे. मोदींचा डांगोरा पिटला जावा यासाठी पाणी पाठविल्या जाणाऱ्या रेल्वेवर प्रचारसामग्री लावली जात आहे.काय सांगते आकडेवारीमोदी सरकारच्या कारकीर्दीत वर्षभरात महाराष्ट्रामध्ये ३२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. देशातील २४३ जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत, मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली नाही. हे आम्ही नव्हे तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत सरकारची कानउघाडणी केलेली आहे. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी देताना सिंघवी म्हणाले की, यातील ८३ शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. त्यात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.