शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

दररोज नऊ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: April 14, 2016 01:01 IST

परिस्थितीमुळे विवश झालेले महाराष्ट्रातील नऊ शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. मोदी सरकार शेतकऱ्यांबद्दल पूर्णपणे असंवेदनशील बनले आहे. देशातील परिस्थिती काय आहे. सरकारने कृषी

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीपरिस्थितीमुळे विवश झालेले महाराष्ट्रातील नऊ शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. मोदी सरकार शेतकऱ्यांबद्दल पूर्णपणे असंवेदनशील बनले आहे. देशातील परिस्थिती काय आहे. सरकारने कृषी संकटावर मात करण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत, याबद्दल श्वेतपत्र जारी करावे, अशी मागणी काँग्रेसने बुधवारी केली आहे.देशातील दहा राज्ये दुष्काळाच्या खाईत सापडली आहेत. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट असून गंभीर चिंतेची बाब बनली आहे. त्यांचे ऐकून घ्यायला कुणीही नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते मनु अभिषेक सिंघवी यांनी येथे म्हटले. लातूरला रेल्वेने पाणी पोहोचविण्यात आले, मात्र ते उंटाच्या तोंडात जीरे देण्यासारखे आहे. एकट्या लातूरला त्यापेक्षा शंभर पट जास्त हवे असून तरच लोकांची गरज भागू शकेल, असेही ते म्हणाले. दुष्काळ असतानाही मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या मृतदेहांवर राजकारण चालविले आहे. मोदींचा डांगोरा पिटला जावा यासाठी पाणी पाठविल्या जाणाऱ्या रेल्वेवर प्रचारसामग्री लावली जात आहे.काय सांगते आकडेवारीमोदी सरकारच्या कारकीर्दीत वर्षभरात महाराष्ट्रामध्ये ३२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. देशातील २४३ जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत, मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली नाही. हे आम्ही नव्हे तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत सरकारची कानउघाडणी केलेली आहे. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी देताना सिंघवी म्हणाले की, यातील ८३ शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. त्यात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.