शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

आरीफ माजिदला आठ डिसेंबरपर्यंत NIA ची कोठडी

By admin | Updated: November 29, 2014 15:33 IST

इस्लामिक स्टेटसाठी इराकमध्ये लढायला गेलेल्या कल्याणच्या आरीफ माजिदला आठ डिसेंबर पर्यंत राष्ट्रीय तपास संस्थेच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २९ - इस्लामिक स्टेटसाठी इराकमध्ये लढायला गेलेल्या व भारतात परत आणण्यात आलेल्या कल्याणच्या आरीफ माजिदला आठ डिसेंबर पर्यंत राष्ट्रीय तपास संस्थेच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. काही महिन्यांपूर्वी कल्याण येथून अचानक गायब होऊन इराक आणि सीरियात इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेने चालवलेल्या संघर्षात सामील झालेल्या चार तरुणांपैकी आरिफ माजिद हा तरुण रिसर्च अँड अनालीसिस विंग (रॉ) या हेर संस्थेच्या प्रयत्नांतून शुक्रवारी तुर्कस्थानमधून भारतात परतला आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे.
माजिद कुणा कुणाच्या संपर्कात होता, भारतामध्ये इसिससाठी आणखी कोण काम करत आहे, इराकमध्ये तो कुणाला भेटला, त्यानं नक्की तिथे काय केलं, त्याच्यावर भारतामध्ये काही कामगिरी पार पाडण्याची तर जबाबदारी दिलेली नाही ना, अशा अनेक प्रश्नांच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास संस्थेने माजिदची कोठडी मागितली होती. न्यायालयाने एनआयआयचे हे म्हणणे मान्य करत आठ डिसेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याच्या चेह-यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. त्यामुळे त्याचे ब्रेनवॉशिंग पद्धतशीरपणे झाले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच माजिदप्रमाणे आणखी किती भारतीय तरूण अशा प्रकारच्या ब्रेनवॉशिंगचे शिकार झाले आहेत हा प्रश्नही एनआयआयपुढे आहे.
आरिफला मुंबईत आणल्यानंतर काही तासांतच केंद्रीय गृहखात्याने त्याला अटक करण्याची सूचना एनआयएला केली. आरिफसह इसिस आणि या दहशतवादी संघटनेच्या हस्तकांविरोधात भा.दं.वि.च्या कलम 125 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तो दोषी सिद्ध झाल्यास आरिफला अधिकाधिक जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. 
आरिफला मुंबईत आणल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. तसेच त्याला सकाळी मुंबईत आणल्याचे सुरक्षा यंत्रणोकडून त्याच्या कुटुंबियांना कळवण्यात आले होते, असेही सुत्रांनी सांगितले. 
शुक्रवारी दिवसभर एनआयएने आरिफला त्याने मे महिन्यात घर सोडण्यापासून आजवरच्या घटनाक्रमाबाबत विचारणा केली, असे सूत्रांनी सांगितले. मात्र त्याच्या परतण्याने बरेच प्रश्न उभे केले असून, त्याच्या तपासातून या तरुणांची माथी भडकवणा:यांचा तसेच त्यांना भारतात आणि इराकमध्ये साहाय्य करणा-यांचा छडा लागू शकतो. 
कल्याणमधील आरिफ माजिद, शहीन टंकी, फहद शेख आणि अमान तांडेल हे चार जण 23 मे रोजी अन्य 22 जणांबरोबर इराकमधील धार्मिक स्थळांची तीर्थयात्र करण्याच्या निमित्ताने विमानाने बगदादला गेले होते. 
दुस:या दिवशी आरिफने त्याच्या कुटुंबीयांना दूरध्वनी करून कळवले होते, की ते इराकला गेले आहेत आणि पूर्वसूचना न देता गेल्याबद्दल माफी मागितली होती. भारतात परतल्यावर त्यांच्या सहप्रवाशांनी हे चौघे बगदादहून टॅक्सी भाडय़ाने घेऊन इराकमधील फालुजा येथे गेल्याचे सांगितले होते. दरम्यान, यापैकी एकाच्या मृत्यूचेही वृत्त आले होते.