शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

एनआयएच्या कारवाईची इसिसने घेतली धास्ती

By admin | Updated: April 21, 2016 10:10 IST

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जानेवारी महिन्यात केलेल्या कारवाईच्या पार्श्वभुमीवर इसीसने भारतातील दहशतवाद्यांना थोड्या काळासाठी शांत राहण्याचे आदेश दिले आहेत

ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २१ - राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जानेवारी महिन्यात केलेल्या कारवाईच्या पार्श्वभुमीवर इसीसने भारतातील दहशतवाद्यांना थोड्या काळासाठी शांत राहण्याचे आदेश दिले आहेत. इसीसच्या सिरियामधील मुख्य हँण्डरलने हे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. एनआयएने जानेवारी महिन्यात कारवाई करत मुदब्बीर मुश्ताक शेखला अटक करत अनेक राज्यांत केलेल्या कारवाईच्या  पार्श्वभुमीवर हे आदेश देण्यात आले आहेत. मुदब्बीर मुश्ताक शेखला एनआयएने जानेवारी महिन्यात मुंब्रा येथून अटक केली होती. मुदब्बीर मुश्ताक शेख (३२) हा 'इसिस'चा भारतामधील मुख्य कमांडिंग अधिकारी होता. अनेक गोरगरीब तरुणांना इसिसच्या जाळ्यात ओढण्याची व त्यांना इसिसपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तो पार पाडत होता.
 
इसीसमध्ये तरुणांना भर्ती करण्याची जबाबदारी शफी अरमार उर्फ युसूफवर आहे. इंटरनेट तसंच सोशल मिडियाच्या माध्यमातून संपर्कात असणा-या भारतीयांना शफी अरमारने ऑनलाइन वापर मर्यादित करण्याचे आदेश दिले आहेत. शफी अरमारने भारतातील संपर्कात असणा-या व्यक्तींना भारतात हल्ले करण्यासाठी तरुणांना इसीसच्या जाळ्यात ओढून भर्ती करुन इराक किंवा सिरियामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवण्याचीही जबाबदारी दिली आहे. 
शफी अरमारने आदेश दिल्यापासून इसीस आणि संपर्कात असणा-या भारतीय तरुणांमधील ऑनलाइन संपर्क कमी झाला असल्याचं गुप्तचर खात्यातील अधिका-याने सांगितलं आहे. जानेवारीमध्ये एनआयएने कारवाई करत जवळपास 24 लोकांना अटक केली होती. यामध्ये इसीसमध्ये भर्ती करण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या सदस्यांचादेखील समावेश होता. महत्वाचं म्हणजे जानेवारी महिन्यात शफी अम्मार उर्फ युसुफ हाताळत असलेल्या इसिसच्या १६ ऑपरेटीव्हना अटक करण्यात आली होती ज्यामध्ये मुदब्बीर शेखचादेखील समावेश होता.
 
गेल्या काही महिन्यांपासून इसीसने आपला संपर्क जरी कमी केला असला तरी याचा अर्थ इसीस पुर्णपणे शांत झालं आहे असा नाही असा इशारा गुप्तचर खात्याने दिला आहे.इसीसच्या वेबसाईट, सोशल मिडियाला सतत फॉलो करणा-यांवर अधिका-यांची नजर आहे. हे लोक भारत सोडून इसीसमध्ये सहभागी होण्यासाठी जात असल्याची शंका आल्यास लगेच प्रतिबंध करण्यास येईल अशी माहिती भारतीय गुप्तचर खात्यातील सुत्रांनी दिली आहे.