शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

सौरऊर्जा वापरून उपग्रह इच्छित कक्षेत नेण्याचे नवे तंत्र

By admin | Updated: June 19, 2017 01:22 IST

अग्निबाणाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर नेऊन सोडलेल्या उपग्रहास नियंत्रित रेटा देऊन इच्छित भूस्थिर कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी भारतीय

नवी दिल्ली: अग्निबाणाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर नेऊन सोडलेल्या उपग्रहास नियंत्रित रेटा देऊन इच्छित भूस्थिर कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) एक नवे ‘प्रॉपल्शन’ तंत्रज्ञान विकसित करीत असून ते यशस्वी झाल्यास तुलनेने कमी खर्चात उपर्गर सोडण्याचे नवे युग सुरु होऊ शकेल. ‘इलेक्ट्रिक प्रॉपल्शन’ (ईपी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानाने सौर ऊर्जेचे विद्युत भर्जेत रूपांतर केले जाते व ही विद्युत ऊर्जा अंतराळात सोडलेल्या उपग्रहास नियंत्रित प्रकारे पुढे रेटा देऊन इच्छित कक्षेत ठरलेल्या ठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी वापरली जाते. ५ मे रोजी ‘जीसॅट-९’ हा उपग्रह सोडताना हे तंत्रज्ञान प्रथमच प्रायोगिक स्वरूपात वापरले गेले. अग्निबाणाने उपग्रह गुरुत्वाकर्षण रेषेच्या पलिकडे नेऊन सोडला की पृथ्वीपासून ३६ हजार किमी उंचीवर भूस्थिर कक्षेत नेऊन सोडण्यासाठी त्याला ठराविक वेळेला ठराविक जोराने पुढे रेटा द्यावा लागतो. शिवाय वेळोवेळी कक्षेत फेरबदल करण्यासाठी व १०-१२ वर्षांच्या आयुष्यात त्याला एका जागी स्थिर राहण्यासाठीही इंधन लागते. सध्या ‘इन्सॅट/जी सॅट’ वर्गातील दोन जहार किलो वजनाच्या उपग्रहासोबत ८०० ते एक हजार किलो रासायनिक प्रॉपेलंट सोबत न्यावे लागते. मात्र, आता ‘इलेक्ट्रिक प्रॉपल्शन’ तंत्रज्ञान यशस्वी झाले की जेमतेम १०० ते ३०० किलो रासायनिक प्रॉपेलंट न्यावे लागेल. यामुळे खर्च कमी होईलच. शिवाय जास्त वजनाचा उपग्रह सोडणे शक्य होईल, असे थिरुवनंतपूरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉ. के, शिवन यांनी सांगितले.अहमदाबाद येथील स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे संचालक तपन मिश्रा यांनी सांगितले की, जीएसएलव्ही एमके -३ या ‘बाहुबली’ अग्निबाणाच्या ५ जून रोजी केलेल्या यशस्वी उड्डाणानंतर ‘इस्रो’ने चार टनापर्यंतचे उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडण्याची क्षमता प्राप्त केली आहे. तरीही ‘जी’ मालिकेतील पुढील उपग्रह ५.६ टन वजनाचा असल्याने, तो फ्रेंच गियानामधीन ‘एरियान’ अग्निबाणाने सोडला जाईल. त्यानंतर, सोडायचा ‘जीसॅट-२०’ उपग्रह फ्रेंच गियानामधून सोडायच्या उपग्रहाहून पाचपट अदिक शक्तिशाली असेल, पण नव्या तंत्रज्ञानामुळे त्याचे वजन ३.५ टनापर्यंत शक्य होईल व त्याचे प्रक्षेपण ‘बाहुबली’ अग्निबाणाने भारतातून केले जाईल.