शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

देशात आता नवा नारा; अरहर मोदी

By admin | Updated: July 29, 2016 03:06 IST

दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी देशाला विनंती केली होती की मला देशाचे पंतप्रधान न करता पहारेकरी (चौकीदार) बनवा. आज त्याच चौकीदाराच्या नाकाखाली टिच्चून डाळीची चोरी होत आहे.

नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी देशाला विनंती केली होती की मला देशाचे पंतप्रधान न करता पहारेकरी (चौकीदार) बनवा. आज त्याच चौकीदाराच्या नाकाखाली टिच्चून डाळीची चोरी होत आहे. आज संपूर्ण देशात लोक घोषणा देत आहेत ‘अरहर मोदी, अरहर मोदी’ अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत गुरुवारी जोरदार हल्ला केला. राहुल गांधी यांनी देशात चलनवाढीच्या मुद्द्यावर विस्ताराने भाष्य केले. पंतप्रधान जीवनावश्यक वस्तूंच्या भडकत्या किमती सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर बोलतात. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने आपला दुसरा वर्धापनदिन जोरात साजरा केला; परंतु या दोन वर्षांत आपण दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही याचा त्यांना विसर पडला. सरकारच्या दुसऱ्या वाढदिवस कार्यक्रमात मोदी ‘मेक इन इंडिया’, ‘कनेक्ट इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’बद्दल बोलले; परंतु ते वाढत्या किमतींबद्दल काही म्हणाले नाहीत. ते एकदाही डाळी, बटाटे किंवा टमाटे यावर बोलले नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.पंतप्रधानांना आश्वासनांचा विसर पडला!जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती हा लोकांसमोर महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यासंदर्भात खोटी आश्वासने देऊन उपयोग नाही. तुम्ही स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडियावर खोटी आश्वासने देऊ शकाल; परंतु वाढत्या किमतीवर नाही, असेही ते म्हणाले. खोट्या आश्वासनांबद्दल मोदींवर हल्ला करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदींनी प्रत्येकाला दिलेल्या आश्वासनाची व त्याचा त्यांना विसर पडल्याची आठवण मी त्यांना करून देऊ इच्छितो.चलनवाढ खाली येईल : जेटलीराहुल गांधींनी केलेला आरोप अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत फेटाळून लावला व चलनवाढ नियंत्रणात असून ती आणखी खाली येईल, असे सांगितले. फेब्रुवारी २०१४मधील यूपीए सरकारवर चलनवाढीसाठी टीका करून जेटली म्हणाले की, ‘‘हा प्रश्न घोषणांचा नसून आकडेवारी लक्षात घ्यायचा आहे. यूपीए सरकारने अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण केली होती व ती आमच्याकडे आली. निवडणूक लढविणारा कोणताही उमेदवार हा आम्ही सत्तेवर आलो तर चलनवाढ खाली आणू असे म्हणत असतो हे अतिशय स्वाभाविक आहे. याबद्दल कोणालाही काही आक्षेप असू नये.’’ मोदी सरकारने चलनवाढ कमी केली असून ती नियंत्रणात ठेवली आहे. पाऊस चांगला झाल्यामुळे चलनवाढ आणखी कमी होईल अशी अपेक्षा आहे. डाळींच्या वाढत्या किमती काळजी कराव्यात अशा आहेत. तो प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलली जात आहेत, असेही ते म्हणाले.