शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

देशात आता नवा नारा; अरहर मोदी

By admin | Updated: July 29, 2016 03:06 IST

दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी देशाला विनंती केली होती की मला देशाचे पंतप्रधान न करता पहारेकरी (चौकीदार) बनवा. आज त्याच चौकीदाराच्या नाकाखाली टिच्चून डाळीची चोरी होत आहे.

नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी देशाला विनंती केली होती की मला देशाचे पंतप्रधान न करता पहारेकरी (चौकीदार) बनवा. आज त्याच चौकीदाराच्या नाकाखाली टिच्चून डाळीची चोरी होत आहे. आज संपूर्ण देशात लोक घोषणा देत आहेत ‘अरहर मोदी, अरहर मोदी’ अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत गुरुवारी जोरदार हल्ला केला. राहुल गांधी यांनी देशात चलनवाढीच्या मुद्द्यावर विस्ताराने भाष्य केले. पंतप्रधान जीवनावश्यक वस्तूंच्या भडकत्या किमती सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर बोलतात. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने आपला दुसरा वर्धापनदिन जोरात साजरा केला; परंतु या दोन वर्षांत आपण दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही याचा त्यांना विसर पडला. सरकारच्या दुसऱ्या वाढदिवस कार्यक्रमात मोदी ‘मेक इन इंडिया’, ‘कनेक्ट इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’बद्दल बोलले; परंतु ते वाढत्या किमतींबद्दल काही म्हणाले नाहीत. ते एकदाही डाळी, बटाटे किंवा टमाटे यावर बोलले नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.पंतप्रधानांना आश्वासनांचा विसर पडला!जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती हा लोकांसमोर महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यासंदर्भात खोटी आश्वासने देऊन उपयोग नाही. तुम्ही स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडियावर खोटी आश्वासने देऊ शकाल; परंतु वाढत्या किमतीवर नाही, असेही ते म्हणाले. खोट्या आश्वासनांबद्दल मोदींवर हल्ला करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदींनी प्रत्येकाला दिलेल्या आश्वासनाची व त्याचा त्यांना विसर पडल्याची आठवण मी त्यांना करून देऊ इच्छितो.चलनवाढ खाली येईल : जेटलीराहुल गांधींनी केलेला आरोप अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत फेटाळून लावला व चलनवाढ नियंत्रणात असून ती आणखी खाली येईल, असे सांगितले. फेब्रुवारी २०१४मधील यूपीए सरकारवर चलनवाढीसाठी टीका करून जेटली म्हणाले की, ‘‘हा प्रश्न घोषणांचा नसून आकडेवारी लक्षात घ्यायचा आहे. यूपीए सरकारने अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण केली होती व ती आमच्याकडे आली. निवडणूक लढविणारा कोणताही उमेदवार हा आम्ही सत्तेवर आलो तर चलनवाढ खाली आणू असे म्हणत असतो हे अतिशय स्वाभाविक आहे. याबद्दल कोणालाही काही आक्षेप असू नये.’’ मोदी सरकारने चलनवाढ कमी केली असून ती नियंत्रणात ठेवली आहे. पाऊस चांगला झाल्यामुळे चलनवाढ आणखी कमी होईल अशी अपेक्षा आहे. डाळींच्या वाढत्या किमती काळजी कराव्यात अशा आहेत. तो प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलली जात आहेत, असेही ते म्हणाले.