शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

बँकिंग क्षेत्रात नवी क्रांती

By admin | Updated: April 15, 2016 03:14 IST

भारतात राजीव गांधींच्या कारकीर्दीत गावोगावी एसटीडी, पीसीओ सुरू झाले तेव्हा सर्वांना अप्रूप वाटले, कारण याद्वारे साऱ्या जगाशी प्रथमच सारा भारत जोडला गेला होता. आता देशाच्या

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीभारतात राजीव गांधींच्या कारकीर्दीत गावोगावी एसटीडी, पीसीओ सुरू झाले तेव्हा सर्वांना अप्रूप वाटले, कारण याद्वारे साऱ्या जगाशी प्रथमच सारा भारत जोडला गेला होता. आता देशाच्या बँकिंग क्षेत्रातही क्रांती होऊ घातली आहे, कारण देशातल्या अडीच लाख ग्रामपंचायतीत कॉमन सर्व्हिस सेंटर्स (सीएससी) द्वारा बँकिंग सुविधा पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशात सध्या १ लाख ६0 हजार कॉमन सर्व्हिस सेंटर्स आहेत. तिथे पासपोर्टचे फॉर्म, फी, विम्याचे हप्ते, विविध प्रकारची बिले भरण्याबरोबरच रोजगारासाठी अर्ज करणे, आधार कार्ड तयार करणे इत्यादी कामे सध्या चालतात. ग्रामीण भागात अवघे ७ हजार कॉमन सर्व्हिस सेंटर्स असे आहेत की, जे बँकिंग सुविधाही पुरवतात. येत्या ३ महिन्यांत या कॉमन सर्व्हिस सेंटर्सद्वारा देशातल्या किमान ६0 हजार ग्रामपंचायतींत बँकिंग सुविधा सुरू होणार आहे, अशी माहिती या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिनेश त्यागी यांनी दिली. देशात ६ लाखांहून अधिक खेडी व अडीच लाख ग्रामपंचायती आहेत. सध्या केवळ ३५ हजार खेडी बँकिंग सेवांशी थेट जोडली गेली आहेत. यासाठीच केंद्राने सीएससीच्या कामकाज विस्ताराची योजना व्यापक प्रमाणात अमलात आणण्याचे ठरवले. देशातल्या प्रत्येक सीएससीमधील ज्या सेंटर्समध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी ही सेवा लवकरच कार्यरत होऊ शकेल, कारण लॅपटॉप व हाताचे ठसे ओळखणाऱ्या उपकरणाची त्यासाठी आवश्यकता आहे, असे त्यागी म्हणाले.कशी होणार पैशांची देवघेव ?कॉमन सर्व्हिस सेंटर्समध्ये बँकिंग सुविधेची नवी योजना साकार झाल्यानंतर कोणत्याही सरकारी बँकेबरोबर बँकेचा खातेधारक आर्थिक देवाणघेवाणचे व्यवहार करू शकेल.ग्रामीण नागरिकांना केवळ हाताचे ठसे देऊन या सेंटरद्वारे बँकेतले पैसे काढता येतील. कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये देवघेवीचा किमान व्यवहार १00 रुपयांच्या रकमेचा करावा लागेल; मात्र कोणत्याही खातेधारकाला एकावेळी १0 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही.खात्यातून रक्कम कमी होताच त्याची पावती ग्राहकाला मिळेल व बँकेद्वारा रक्कम सर्व्हिस सेंटरच्या खात्यात वर्ग होताच त्या सेंटरचा स्थानिक संचालक ती रक्कम खातेधारकाला अदा करील. या व्यवहाराचे योग्यप्रकारे संचालन करणाऱ्या स्थानिक संचालकाला ५ ते १५ रुपयांचे कमिशन मिळेल, अशी ही योजना आहे.