शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वसुलीवर भर नव्या आयुक्तांचा प्राधान्यक्रम : २२ वर्षांचा अनुभवही कमी पडला- कापडणीस

By admin | Updated: June 17, 2016 23:08 IST

जळगाव : महापालिकेची स्थिती बिकट आहे. दुसर्‍या बाजूला विविध संस्थांचे कर्ज नियमीतपणे भरायचे आहे. ही बिकट स्थिती सुधारून पालिकेची स्थिती भक्कम करण्यासाठी वसुलीवर भर देऊ, असे महापालिकेचे नवे आयुक्त किशोर बोर्डे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.

जळगाव : महापालिकेची स्थिती बिकट आहे. दुसर्‍या बाजूला विविध संस्थांचे कर्ज नियमीतपणे भरायचे आहे. ही बिकट स्थिती सुधारून पालिकेची स्थिती भक्कम करण्यासाठी वसुलीवर भर देऊ, असे महापालिकेचे नवे आयुक्त किशोर बोर्डे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.
बोर्डे यांनी शुक्रवारी सायंकाळी पालिकेची सूत्रे हाती घेतली. मावळते आयुक्त संजय कापडणीस या वेळी उपस्थित होते. यानिमित्त बोर्डे यांचे स्वागत व कापडणीस यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रमही सभागृहात झाला.

अभ्यास करून अधिक बोलता येईल
पालिकेची स्थिती बिकट असल्याने प्राधान्यक्रम कुठला हा मुद्दा स्पष्ट करता येणार नाही. परंतु आर्थिक स्थिती मजबूत करण्यासह इतर अडचणी दूर करू. त्यासाठी अभ्यास केला जाईल, असे बोर्डे म्हणाले.

स्वच्छता, वृक्षारोपणाला महत्त्व
पालिकेची स्थिती सुधारण्यासोबत आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण याबाबतही काम करू. वृक्षारोपण केले जाईल, असेही बोर्डे यांनी सांगितले.

सर्वांचे सहकार्य हवे
पालिकेत काम करताना, प्रकल्प पूर्ण करताना सर्वांच्या सहकार्याची गरज असेल. त्यात पदाधिकार्‍यांची महत्त्वाची साथही हवी असेल, असेही बोर्डे यांनी स्पष्ट केले.

जुन्या आयुक्तांचे प्रकल्प पूर्ण करू
जुन्या आयुक्तांनी जे प्रकल्प हाती घेतले होते, ते पूर्ण केले जातील. त्याबाबतचे काम थांबविले जाणार नाही, असेही बोर्डे यांनी स्पष्ट केले.

२२ वर्षांचा अनुभवही कमी पडला
निरोप समारंभात सत्काराला उत्तर देताना जुने आयुक्त कापडणीस म्हणाले, पालिकेत वाद झाले असतील, पण प्रत्येकाने शहर विकासासाठी आपली भूमिका मांडली. कुठलेही वाद वैयक्तिक नव्हते. कधी दुजाभाव करून काम केले नाही, कारवाई केली नाही. परंतु या महापालिकेतील कामाची पद्धत वेगळीच होती, शैली वेगळी होती. त्यामुळे माझा २२ वर्षांचा प्रशासनातील कामाचा अनुभवही कमी पडला. पालिकेची नाजूक आर्थिक स्थिती, वेतन असे अनेक प्रश्न आहेत. परंतु नवे आयुक्त बोर्डे हे नगरपालिकेचा अनुभव घेऊन आले आहे. ते निश्चितच चांगले काम करतील, त्यांचा अनुभव येथे कामी येईल, असेही कापडणीस म्हणाले.


पाणी वितरण व्यवस्था चांगली नव्हती
शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था चांगली नव्हती. गाळे, आरोग्य, स्वच्छता, कर्ज असेे अनेक प्रश्न होते. परंतु कर्मचार्‍यांनी सामूहिक प्रयत्न करून त्यावर काम केले. कुठली तक्रार येऊ दिली नाही, असेही कापडणीस म्हणाले.