शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

नेताजींचा मृत्यू विमान अपघातातच

By admin | Updated: June 1, 2017 01:15 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १८ आॅगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये विमान अपघातामध्येच झाला होता, असे केंद्र सरकारने स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १८ आॅगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये विमान अपघातामध्येच झाला होता, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारच्या या उत्तरामुळे नेताजींच्या मृत्यूविषयीचे गूढ संपले आहे, असे अनेकांना वाटत असले तरी मात्र बोस कुटुंबियांनी त्यास आक्षेप घेतला आहे. कोणताही स्पष्ट पुरावा नसताना केंद्र नेताजींच्या मृत्यूचे कारण कसे काय जाहीर करू शकते?, असा सवाल सुभाषचंद्रांच्या भावाच्या नातवाने केला आहे.गुमनामी बाबा आणि भगवानजी या नावांचा न्या. मुखर्जी आयोगाच्या अहवालात उल्लेख आहे. मात्र बोस हेच त्या नावाने वावरत होते, हे खरे नसल्याचा निष्कर्ष आयोगाने काढला होता, असेही केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. नेताजींचा मृत्यू झालाच नव्हता आणि ते गायब झाल्यानंतर गुमनामी बाबा व भगवानजी या नावाने वावरत होते, असे मानणारा एक वर्ग आहे. नेताजींच्या भावाची नात माधुरी बोस यांनी मात्र नेताजी असे अन्य नावाने वावरत होते, ही शक्यता फेटाळून लावली आहे. गृह मंत्रालयानेही शाहनवाझ समिती, खोसला आयोग व मुखर्जी आयोग यांच्या अहवालाच्या आधारे त्यांचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. ओपन प्लॅटफॉर्म फॉर नेताजी या संघटनेच्या सायक सेन यांनी माहितीच्या अधिकाराद्वारे सुभाषचंद्र बोस यांच्यासंबंधीची काही माहिती विचारली होती. त्यांच्या अर्जाच्या उत्तरात गृह मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मात्र सेन यांनी सरकारच्या माहितीमुळे आपणास धक्का बसल्याचे म्हटले आहे. नेताजींच्या मृत्यूचे कारण शोधण्यात यावे, यासाठी आम्ही झगडत आहोत, विमान अपघाताबाबत निश्चित पुरावा अद्याप सापडलेला नाही. असे असताना कशाच्या आधारे हे उत्तर सरकारने दिले, असा सवाल नेताजींच्या भावाचे नातू व बंगाल भाजपचे उपाध्यक्ष विमान बोस यांनीही केला आहे.मोदींनी दिले होते तपासाचे आश्वासनमी आधी नेताजींचा नातू आहे आणि मग भाजपचा उपाध्यक्ष, असे सांगून विमान बोस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या संबंधीच्या फायली उघड केल्या. त्यावेळी त्यांनी नेताजींविषयीचे गूढ दूर करण्यासाठी त्या प्रकरणाचा तपास करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नव्हता आणि ते चीन वा रशियाला गेले, असे मुखर्जी आयोगाच्या अहवालात स्पष्टपणे म्हटले होते. मात्र तेव्हाच्या सरकारने तो निष्कर्ष फेटाळून लावला होता. नेताजी बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झालाच नव्हता, असे काही संशोधकांचेही म्हणणे आहे.