शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

विमान अपघातातून नेताजी बचावले होते !

By admin | Updated: April 1, 2016 00:53 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस हे १८ आॅगस्ट १९४५ मध्ये तायवान येथे घडलेल्या विमान अपघातातून सुखरूप बचावले होते, असे स्पष्ट संकेत मोदी सरकारने मंगळवारी सार्वजनिक केलेल्या

हैदराबाद : नेताजी सुभाषचंद्र बोस हे १८ आॅगस्ट १९४५ मध्ये तायवान येथे घडलेल्या विमान अपघातातून सुखरूप बचावले होते, असे स्पष्ट संकेत मोदी सरकारने मंगळवारी सार्वजनिक केलेल्या तीन गोपनीय फायलींपैकी एका फाईलवरून मिळाले आहेत. नेताजींनी या विमान अपघातानंतर तीनदा रेडिओवर भाषण दिल्याचा उल्लेख या फाईलमध्ये आहे. हे तिन्ही रेडिओ प्रसारण विमान अपघात घडल्यानंतरचे आहेत. त्यामुळे नेताजींच्या मृत्यूबाबतचे रहस्य अधिक गडद झाले आहे.फाईल क्रमांक ८७०/११/पी/१६/९२/पीओएलमध्ये या रेडिओवरील प्रसारणांचा तपशील दिलेला आहे, जे नेताजींनी दिल्याचे मानले जाते. बंगालच्या गव्हर्नर हाऊसमधून या प्रसारणांचा मजकूर बाहेर आल्याची शक्यता आहे. ३१-मीटर बँडवरून उचलल्याचा दावा गव्हर्नर हाऊसमधील पी. सी. कार यांनी केल्याचा उल्लेख यात आहे.१ जानेवारी १९४६ रोजीचे दुसरे प्रसारण‘आम्हाला दोन वर्षांच्या आत स्वातंत्र्य मिळणारच आहे. ब्रिटिश साम्राज्यवाद पार कोसळला आहे आणि त्यांना आता भारताला स्वातंत्र्य द्यावेच लागेल. अहिंसेच्या मार्गाने भारत कधीच स्वतंत्र होणार नाही. परंतु मी गांधींचा आदर करतो.’२६ डिसेंबर १९४५ रोजीचे पहिले भाषण ‘हल्ली मी महान जागतिक शक्तींच्या आश्रयाला आहे. माझे हृदय भारतासाठी तळमळत आहे. जेव्हा तिसरे महायुद्ध शिखरावर पोहोचले असेल तेव्हा मी भारतात जाईन. ही संधी दहा वर्षांनंतर किंवा त्याआधीही मिळू शकते. तेव्हा मी त्या लोकांना न्यायाच्या पिंजऱ्यात उभा करेल, जे लाल किल्ल्यावर माझ्या लोकांवर खटला चालवित आहेत.’(हे प्रसारित भाषण नेताजींचेच असल्याचे मानले जाते)फेब्रुवारी १९४६ मधील तिसरे प्रसारण‘जपानने आत्मसमर्पण केल्यानंतर माझ्या भारतीय बंधू-भगिनींना संबोधित करण्याची ही माझी तिसरी वेळ आहे. इंग्लंडचे पंतप्रधान पेथिक लॉरेन्स आणि अन्य दोन सदस्यांना भारतात पाठवित आहेत. त्यांचा उद्देश सर्व मार्गांनी भारताचे रक्त शोषून ब्रिटिश साम्राज्यवादाची कायमस्वरूपी वसाहत निर्माण करण्याशिवाय दुसरा नाही.’