शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

नेताजी सुभाषचंद्र बोस बंगालमध्ये के के भंडारींच्या नावे करत होते वास्तव्य ?

By admin | Updated: May 30, 2016 08:59 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस 1960च्या दशकात के के भंडारींच्या नावे शालुमरी आश्रममध्ये वास्तव्य करत होते का ? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे

ऑनलाइन लोकमत - 
हैद्राबाद, दि. 30 - नेताजी सुभाषचंद्र बोस 1960च्या दशकात के के भंडारींच्या नावे शालुमरी आश्रममध्ये वास्तव्य करत होते का ? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. 27 मे रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या काही फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या होत्या. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. 
 
एका फाईलमधील माहितीनुसार 1963मध्ये सरकारमधील उच्च अधिकारी या व्यक्तीबद्दल चर्चा करत होते. सार्वजनिक करण्यात आलेल्या एका फाईलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख वारंवार भंडारी फाईल करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर कुठेच हा उल्लेख दिसत नाही. 
 
(नेताजी बोस सापडले होते विमान दुर्घटनेत)
 
शालुमरी आश्रमाचे सचिव रमानी रंजन दास यांनी 1963मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना सुभाषचंद्र बोस यांच्यासंबंधी एक पत्र पाठवलं होतं. त्यानंतर नेहरुंचे मुख्य खासगी सचिव के राम यांनी तात्काळ गुप्तचर विभागाचे संचालक बी एन मलिक यांना गुप्त मेमो पाठवला होता. 23 मे 1963 रोजी हे पत्र पाठवण्यात आलं होतं. ज्यामध्ये याचा उल्लेख करण्यात आला होता. मलिक यांनी 12 जूनला या मेमोचं उत्तर पाठवलं होतं. 
 
त्याचवर्षी पुन्हा 7 सप्टेंबरला पंतप्रधान कार्यालयाने गुप्त कागदपत्रांमध्ये के के भंडारींचा उल्लेख केला. 11 नोव्हेंबरला पुन्हा हा उल्लेख करण्यात आला. 16 नोव्हेंबरला गुप्तचर खात्याने यावर आपलं उत्तर पाठवलं होतं. 
 
सुभाषचंद्र बोस शालुमरी बाबा नसल्याचा मुखर्जी आयोगाचा निकाल - 
जस्टीस मुखर्जी आयोग 1999मध्ये गठीत करण्यात आला होता. सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाईल्सच्या प्रती हस्तांतरित करण्यासाठी मुखर्जी आयोगाकडून दबाव टाकण्यात आला होता. मुखर्जी आयोगाकडून टाकण्यात आलेल्या दबावानंतर पंतप्रधान कार्यलयाने फाईल्सना डाऊनग्रेड करत आयोगाला उपलब्ध करुन दिल्या होत्या. 5 जुलै 2000 मध्ये अंतर्गत सचिवांनी (एनजीओ) पाठवलेल्या पत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे. 
 
त्यावेळी शालुमरी बाबा नेताजी असल्याच्या बातम्यांमुळे देशभरात सुभाषचंद्र बोस पुन्हा परत आल्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र मुखर्जी आयोगाने नकार देत शालुमरी बाबा नेताजी सुभाषचंद्र बोस नसल्याचं सांगितलं होतं.
 
गुमनामी बाबाच होते नेताजी सुभाषचंद्र बोस?
उत्तर प्रदेशच्या फैजाबाद जिल्हा कोषागारात असलेल्या गुमनामी बाबांच्या पेटीतून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांचे जुने फोटो सापडल्याने गुमनामी बाबाच प्रत्यक्षात नेताजी होते काय याबाबतचे गूढ वाढले होते. गुमनामी बाबांच्या या पेटीत नेताजींचे आई-वडील जानकीनाथ आणि प्रभावती बोस यांचेही छायाचित्र सापडले होते. गुमनामी बाबा १९८२ ते १९८५ या त्यांच्या अखेरच्या दिवसात रामभवन येथे वास्तव्याला होते. या रामभवनचे मालक शक्तिसिंग यांनी अशी छायाचित्रे मिळाली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. त्यांनी सांगितले की, बोस कुटुंबियांच्या या छायाचित्रात नेताजींच्या आई-वडिलांशिवाय आणखी २२ सदस्य दिसतात.