शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

भारताच्या नोटाबंदीमुळे नेपाळ आर्थिक संकटात

By admin | Updated: January 15, 2017 00:19 IST

चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे शेजारच्या नेपाळमध्ये संकट उभे ठाकले आहे. आपल्याकडील ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा

- नितीन अग्रवाल,  नवी दिल्ली

चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे शेजारच्या नेपाळमध्ये संकट उभे ठाकले आहे. आपल्याकडील ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा भारताकडून बदलून घेण्यासाठी सतत प्रयत्न करीत असलेल्या नेपाळने लवकरच हा प्रश्न सुटला नाही तर नेपाळी लोकांचा भारतावरील विश्वास उडून जाईल, असा इशारा दिला आहे.नेपाळचे भारतातील राजदूत दीप कुमार उपाध्याय म्हणाले की, भारत सरकारला विनंती करतो की हा प्रश्न लवकर सोडवावा अन्यथा नेपाळी लोकांचा आधी नेपाळ सरकारवरून आणि भारत सरकारवरील विश्वास उडून जाईल.’’ ते म्हणाले की, नोटाबंदीमुळे नेपाळमध्ये लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी नेपाळ राष्ट्र बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांच्या नेतृत्वाखाली अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी भारतात येऊन गेले. हे अधिकारी रिझर्व्ह बँक, अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालयाशी उत्तर शोधण्यासाठी चर्चा करीत आहेत. आम्ही हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन भारत सरकारने आम्हाला दिली असल्याची माहितीही उपाध्याय यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)- नेपाळ भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दरवर्षी अमेरिकन डॉलरच्या बदल्यात सरासरी ६०० कोटी रुपये मूल्यांच्या भारतीय नोटा घेतो. भारताच्या निर्णयामुळे नेपाळ राष्ट्र बँकेची फार मोठी रक्कम चलनातून बाद झाली आहे. नेपाळमध्ये काही लोक घसघशीत कमिशन घेऊन भारतीय नोटांना नेपाळी चलनात बदलून देत आहेत. भारताच्या आश्वासनावर विश्वास ठेवून दीप कुमार उपाध्याय यांनी नेपाळी लोकांना त्यांनी घाईगर्दीत आपल्याकडील पैशांचे नुकसान करून घेऊ नये, असे आवाहन केले.