शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या नोटाबंदीमुळे नेपाळ आर्थिक संकटात

By admin | Updated: January 15, 2017 00:19 IST

चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे शेजारच्या नेपाळमध्ये संकट उभे ठाकले आहे. आपल्याकडील ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा

- नितीन अग्रवाल,  नवी दिल्ली

चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे शेजारच्या नेपाळमध्ये संकट उभे ठाकले आहे. आपल्याकडील ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा भारताकडून बदलून घेण्यासाठी सतत प्रयत्न करीत असलेल्या नेपाळने लवकरच हा प्रश्न सुटला नाही तर नेपाळी लोकांचा भारतावरील विश्वास उडून जाईल, असा इशारा दिला आहे.नेपाळचे भारतातील राजदूत दीप कुमार उपाध्याय म्हणाले की, भारत सरकारला विनंती करतो की हा प्रश्न लवकर सोडवावा अन्यथा नेपाळी लोकांचा आधी नेपाळ सरकारवरून आणि भारत सरकारवरील विश्वास उडून जाईल.’’ ते म्हणाले की, नोटाबंदीमुळे नेपाळमध्ये लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी नेपाळ राष्ट्र बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांच्या नेतृत्वाखाली अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी भारतात येऊन गेले. हे अधिकारी रिझर्व्ह बँक, अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालयाशी उत्तर शोधण्यासाठी चर्चा करीत आहेत. आम्ही हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन भारत सरकारने आम्हाला दिली असल्याची माहितीही उपाध्याय यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)- नेपाळ भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दरवर्षी अमेरिकन डॉलरच्या बदल्यात सरासरी ६०० कोटी रुपये मूल्यांच्या भारतीय नोटा घेतो. भारताच्या निर्णयामुळे नेपाळ राष्ट्र बँकेची फार मोठी रक्कम चलनातून बाद झाली आहे. नेपाळमध्ये काही लोक घसघशीत कमिशन घेऊन भारतीय नोटांना नेपाळी चलनात बदलून देत आहेत. भारताच्या आश्वासनावर विश्वास ठेवून दीप कुमार उपाध्याय यांनी नेपाळी लोकांना त्यांनी घाईगर्दीत आपल्याकडील पैशांचे नुकसान करून घेऊ नये, असे आवाहन केले.