शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

नेहरूसरकारने केली होती नेताजींच्या कुटुंबाची हेरगिरी?

By admin | Updated: April 11, 2015 00:50 IST

पंडित जवाहरलाल नेहरू सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर तब्बल २० वर्षे पाळत ठेवली होती. इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) दोन

नवी दिल्ली : पंडित जवाहरलाल नेहरू सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर तब्बल २० वर्षे पाळत ठेवली होती. इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) दोन फाईल्समधून हे धक्कादायक सत्य समोर आल्याचा दावा केला जात असतानाच या वृत्ताने राजकीय वादळ निर्माण झाले आहे.नेताजींच्या कुटुंबियांनी या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशीची मागणी केली आहे तर काँग्रेसने सत्य उघडकीस आणण्यासाठी सरकारतर्फे संपूर्ण दस्तावेज जाहीर का करण्यात येत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. काही निवडक भागच सरकार का लीक करीत आहे, असे या पक्षाचे म्हणणे आहे. या फाईल्स सध्या नॅशनल आर्कायव्हस्मध्ये आहेत.पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका लक्षात घेता या वादाला महत्त्व प्राप्त झाले आहे. १९४८ ते १९६८ या काळात ही पाळत ठेवण्यात आली, असे सांगितले जात आहे. या काळात नेहरू यांच्याशिवाय लालबहादूर शास्त्री, गुलजारीलाल नंदा व इंदिरा गांधी या सुद्धा पंतप्रधान होत्या. मग हे सर्वच या कथित हेरगिरीत सहभागी होते काय? एवढेच नाही तर वल्लभभाई पटेल, राजगोपालाचारी, कैलाशनाथ काटजू, गुलजारीलाल नंदा, यशवंतराव चव्हाण आदी गृहमंत्री होते. त्यांचीही या प्रकरणात काही भूमिका होती काय, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला. अशी झाली कथित हेरगिरीयासंदर्भात करण्यात आलेल्या दाव्यानुसार १९४८ ते १९६८ या कालावधीत बोस कुटुंबियांवर पाळत ठेवण्यात आली होती. या २० वर्षांपैकी १६ वर्षे पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान होते आणि आयबी थेट त्यांनाच रिपोर्ट करीत होती. ब्रिटिशांच्या काळापासून सुरूअसलेली हेरगिरी स्वातंत्र्यानंतरही आयबीने बोस कुटुंबियांच्या कोलकात्यातील वुडबर्न पार्क व ३८/२ एल्गन रोड या घरांवर पाळत ठेवत तशीच सुरू ठेवली होती. बोस कुटुंबियांना येणारी व त्यांनी इतरांना लिहिलेली पत्र सुद्धा आयबीचे हेर कॉपी करीत असत. विदेश दौऱ्यात सावलीसारखे त्यांच्या मागावर असत. नेमक्या कुठल्या कारणाने ही हेरगिरी केली हे स्पष्ट झाले नसले तरी नेताजींचे पुतणे शिशिरकुमार बोस व अमेयनाथ यांच्यावर आयबीचे जास्त लक्ष होते,असे सूत्रांचे म्हणणे आहे.आयबीच्या फाईल्स बहुदा गोपनीय दस्तावेजांच्या श्रेणीतून हटविल्या जात नाहीत. परंतु मूळ फाईल अजूनही पश्चिम बंगाल सरकारकडे आहे. या फाईल्स चुकीने गोपनीय श्रेणीतून हटविल्या आल्या असण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)