शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

नेहरूसरकारने केली होती नेताजींच्या कुटुंबाची हेरगिरी?

By admin | Updated: April 11, 2015 00:50 IST

पंडित जवाहरलाल नेहरू सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर तब्बल २० वर्षे पाळत ठेवली होती. इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) दोन

नवी दिल्ली : पंडित जवाहरलाल नेहरू सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर तब्बल २० वर्षे पाळत ठेवली होती. इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) दोन फाईल्समधून हे धक्कादायक सत्य समोर आल्याचा दावा केला जात असतानाच या वृत्ताने राजकीय वादळ निर्माण झाले आहे.नेताजींच्या कुटुंबियांनी या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशीची मागणी केली आहे तर काँग्रेसने सत्य उघडकीस आणण्यासाठी सरकारतर्फे संपूर्ण दस्तावेज जाहीर का करण्यात येत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. काही निवडक भागच सरकार का लीक करीत आहे, असे या पक्षाचे म्हणणे आहे. या फाईल्स सध्या नॅशनल आर्कायव्हस्मध्ये आहेत.पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका लक्षात घेता या वादाला महत्त्व प्राप्त झाले आहे. १९४८ ते १९६८ या काळात ही पाळत ठेवण्यात आली, असे सांगितले जात आहे. या काळात नेहरू यांच्याशिवाय लालबहादूर शास्त्री, गुलजारीलाल नंदा व इंदिरा गांधी या सुद्धा पंतप्रधान होत्या. मग हे सर्वच या कथित हेरगिरीत सहभागी होते काय? एवढेच नाही तर वल्लभभाई पटेल, राजगोपालाचारी, कैलाशनाथ काटजू, गुलजारीलाल नंदा, यशवंतराव चव्हाण आदी गृहमंत्री होते. त्यांचीही या प्रकरणात काही भूमिका होती काय, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला. अशी झाली कथित हेरगिरीयासंदर्भात करण्यात आलेल्या दाव्यानुसार १९४८ ते १९६८ या कालावधीत बोस कुटुंबियांवर पाळत ठेवण्यात आली होती. या २० वर्षांपैकी १६ वर्षे पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान होते आणि आयबी थेट त्यांनाच रिपोर्ट करीत होती. ब्रिटिशांच्या काळापासून सुरूअसलेली हेरगिरी स्वातंत्र्यानंतरही आयबीने बोस कुटुंबियांच्या कोलकात्यातील वुडबर्न पार्क व ३८/२ एल्गन रोड या घरांवर पाळत ठेवत तशीच सुरू ठेवली होती. बोस कुटुंबियांना येणारी व त्यांनी इतरांना लिहिलेली पत्र सुद्धा आयबीचे हेर कॉपी करीत असत. विदेश दौऱ्यात सावलीसारखे त्यांच्या मागावर असत. नेमक्या कुठल्या कारणाने ही हेरगिरी केली हे स्पष्ट झाले नसले तरी नेताजींचे पुतणे शिशिरकुमार बोस व अमेयनाथ यांच्यावर आयबीचे जास्त लक्ष होते,असे सूत्रांचे म्हणणे आहे.आयबीच्या फाईल्स बहुदा गोपनीय दस्तावेजांच्या श्रेणीतून हटविल्या जात नाहीत. परंतु मूळ फाईल अजूनही पश्चिम बंगाल सरकारकडे आहे. या फाईल्स चुकीने गोपनीय श्रेणीतून हटविल्या आल्या असण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)