शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

नेहरूसरकारने केली होती नेताजींच्या कुटुंबाची हेरगिरी?

By admin | Updated: April 11, 2015 00:50 IST

पंडित जवाहरलाल नेहरू सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर तब्बल २० वर्षे पाळत ठेवली होती. इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) दोन

नवी दिल्ली : पंडित जवाहरलाल नेहरू सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर तब्बल २० वर्षे पाळत ठेवली होती. इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) दोन फाईल्समधून हे धक्कादायक सत्य समोर आल्याचा दावा केला जात असतानाच या वृत्ताने राजकीय वादळ निर्माण झाले आहे.नेताजींच्या कुटुंबियांनी या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशीची मागणी केली आहे तर काँग्रेसने सत्य उघडकीस आणण्यासाठी सरकारतर्फे संपूर्ण दस्तावेज जाहीर का करण्यात येत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. काही निवडक भागच सरकार का लीक करीत आहे, असे या पक्षाचे म्हणणे आहे. या फाईल्स सध्या नॅशनल आर्कायव्हस्मध्ये आहेत.पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका लक्षात घेता या वादाला महत्त्व प्राप्त झाले आहे. १९४८ ते १९६८ या काळात ही पाळत ठेवण्यात आली, असे सांगितले जात आहे. या काळात नेहरू यांच्याशिवाय लालबहादूर शास्त्री, गुलजारीलाल नंदा व इंदिरा गांधी या सुद्धा पंतप्रधान होत्या. मग हे सर्वच या कथित हेरगिरीत सहभागी होते काय? एवढेच नाही तर वल्लभभाई पटेल, राजगोपालाचारी, कैलाशनाथ काटजू, गुलजारीलाल नंदा, यशवंतराव चव्हाण आदी गृहमंत्री होते. त्यांचीही या प्रकरणात काही भूमिका होती काय, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला. अशी झाली कथित हेरगिरीयासंदर्भात करण्यात आलेल्या दाव्यानुसार १९४८ ते १९६८ या कालावधीत बोस कुटुंबियांवर पाळत ठेवण्यात आली होती. या २० वर्षांपैकी १६ वर्षे पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान होते आणि आयबी थेट त्यांनाच रिपोर्ट करीत होती. ब्रिटिशांच्या काळापासून सुरूअसलेली हेरगिरी स्वातंत्र्यानंतरही आयबीने बोस कुटुंबियांच्या कोलकात्यातील वुडबर्न पार्क व ३८/२ एल्गन रोड या घरांवर पाळत ठेवत तशीच सुरू ठेवली होती. बोस कुटुंबियांना येणारी व त्यांनी इतरांना लिहिलेली पत्र सुद्धा आयबीचे हेर कॉपी करीत असत. विदेश दौऱ्यात सावलीसारखे त्यांच्या मागावर असत. नेमक्या कुठल्या कारणाने ही हेरगिरी केली हे स्पष्ट झाले नसले तरी नेताजींचे पुतणे शिशिरकुमार बोस व अमेयनाथ यांच्यावर आयबीचे जास्त लक्ष होते,असे सूत्रांचे म्हणणे आहे.आयबीच्या फाईल्स बहुदा गोपनीय दस्तावेजांच्या श्रेणीतून हटविल्या जात नाहीत. परंतु मूळ फाईल अजूनही पश्चिम बंगाल सरकारकडे आहे. या फाईल्स चुकीने गोपनीय श्रेणीतून हटविल्या आल्या असण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)