शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
3
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
4
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
5
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
6
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
7
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
8
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
9
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
10
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
11
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
12
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
13
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
14
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
15
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
16
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
18
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
19
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
20
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?

नेहरूंची नेताजींच्या कुटुंबियांवर तब्बल २० वर्षे पाळत

By admin | Updated: April 10, 2015 11:47 IST

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर तब्ब्ल २० वर्षे पाळत ठेवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर तब्ब्ल २० वर्षे पाळत ठेवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. १९४८ ते १९६८ या काळात बोस कुटुंबियांवर पाळत ठेवण्यात आली होती, अशी माहिती राष्ट्रीय संग्रहालयात असलेल्या गुप्तचर विभागाच्या कागदपत्रांतून समोर आली आहे. या २० वर्षांच्या कालावधीत नेहरू १६ वर्षे देशाचे पंतप्रधान होते आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी थेट त्यांच्याकडे अहवाल सादर करत असत.
ब्रिटीशांच्या काळापासून चालत आलेल्या आयबीने २० वर्ष बोस यांच्या कोलकात्यातील  वुडबन पार्क आणि ३८/२ इलगिन रस्त्यावरील बोस यांच्या घरांवर नजर ठेवली होती. बोस यांच्या कुटुंबियांनी लिहीलेली अथवा त्यांना आलेली पत्र तपासण्यापासून ते त्यांच्या देशांतर्गत वा परदेशातील प्रवासावरही बारकाईने पाळत ठेवण्यात येत होती. प्रामुख्याने बोस यांचे चुलत बंधू शिशिर बोस व अमेयनाथ बोस यांच्यावर पाळत ठेवम्यात येत होती.  बोस यांचे कुटुंबिय कोणाची भेट घेतात, त्यांच्याशी काय चर्चा करताते हे जाणून घेण्याचा आयबीचा प्रयत्न होता, अशीही माहिती समोर आली आहे. मात्र या पाळतीमागचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही.