शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नेहरूंनी सिक्कीम सीमेसंदर्भात चीनशी केला नव्हता कोणताही करार

By admin | Updated: July 4, 2017 15:13 IST

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सिक्कीम सीमेसंदर्भात चीनशी कोणताही करार केला नव्हता

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 4 - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सिक्कीम सीमेसंदर्भात चीनशी कोणताही करार केला नव्हता, याचा खुलासा 58 वर्षांनंतर झाला आहे. देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिशांच्या राजवटीत चीनसोबत सिक्कीम सीमेसंदर्भातील कोणत्याही संधीचं समर्थन केलं नव्हतं. हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, 1959 सालात लिहिलेल्या एका पत्रानं याचा खुलासा झाला आहे. त्यावेळी नेहरूंनी चीनसोबत सिक्कीम सीमेबाबतच्या संधी करारावर स्वाक्षरी केली नव्हती. याचा खुलासा 58 वर्षांनंतर झाला आहे. त्यामुळे चीनच्या दाव्यातील हवाच निघून गेली आहे. चीनच्या मते, सिक्कीम सीमेवरून भारत आणि भूतानसोबत आमची संधी झाली होती. मात्र नेहरूंनी लिहिलेल्या या पत्राचा या दाव्यात कधीही उल्लेख केलेला नव्हता. पंडित जवाहरलाल नेहरूंनी चीनसोबत तिबेट आणि सिक्कीम सीमेसंदर्भात 1890मध्ये कोणतीही संधी केली नव्हती, ही बाब नेहरूंच्या पत्रामुळे समोर आली आहे. चीन, भूतान आणि भारताच्या डोंगराळ भागातल्या सीमेच्या वादामुळे भारत आणि चीनमधील मतभेद टोकाला गेले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता जिंग शुआंग यांनी 22 मार्च, 1959 साली लिहिलेल्या या पत्राचा हवाला दिला होता.

(सिक्कीम सीमेवर भारतीय लष्करानं वाढवली कुमक)(सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा रद्द)
 
गेल्या काही दिवसांपासून सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेल्या डोका ला प्रदेशात चीनने सुरू केलेल्या रस्ता बांधणीच्या आगळिकीवरून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये महिन्याभरापासून तणातणी सुरू आहे. घुसखोरी केल्यानंतरही चीनने उलटा कांगावा सुरू ठेवला आहे. भारताने सिक्कीम सीमेवर बाजू भक्कम करण्यासाठी जादा जवान तैनात केले आहेत.भारतीय सीमेवर वाढीव जवान तैनात करणे याचा अर्थ युद्धाची तयारी करणे असा होत नाही. भारतीय लष्कर तिथे स्वतःच्या सीमेचं संरक्षण करण्याच्या पार्श्वभूमीत असेल. सिक्कीम सीमेवर सध्या उद्भवलेला तणाव हा 1962च्या युद्धानंतर भारत आणि चीन यांच्या सैन्यामध्ये सर्वात दीर्घकाळ सुरू राहिलेला तिढा आहे. विशेष म्हणजे भारत आणि शेजारी भूतानने निषेध नोंदविल्यानंतर माघारी हटण्याऐवजी सीमेवरील चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घेतलेला आक्रमक पवित्रा, भारताचे सीमेवरील दोन बंकर नष्ट केले जाणे आणि चीनच्या राजनैतिक प्रतिक्रियेला चढलेली अधिक तिखट धार पाहता भारताने सावधानता म्हणून ही तयारी केली आहे. खुद्द लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही प्रत्यक्ष जागेवर जाऊन काही दिवसांपूर्वी परिस्थितीचा आढावा घेतला होता. एवढेच नव्हे तर पाकिस्तान, चीन आणि देशांतर्गत अशांतता अशा अडीच आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे, अशी ग्वाहीही जनरल रावत यांनी दिली होती.
डोका ला भागात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये शारीरिक रेटारेटी होऊन परिस्थिती गंभीर झाल्यानंतर भारतीय लष्कराने मेजर जनरल हुद्द्याच्या अधिकाऱ्याला तातडीने तेथे पाठवून चीनच्या समकक्ष लष्करी अधिकाऱ्याशी ध्वजबैठक घेण्याचा प्रस्ताव दिला. दोनदा नकार दिल्यानंतर तिसऱ्या वेळी चीन ध्वजबैठकीला आला पण डोका लाच्या लालटेन भागातून भारतानेच आपले सैन्य काढून घ्यावे, असा उरफाटा प्रस्ताव त्याने दिला. चीनने सिक्किम सीमेवरील या घटनाक्रमाचे निमित्त पुढे करून नथु ला खिंडीतून जाणारी कैलास-मानसरोवर यात्राही अडवून ठेवली. त्यामुळे चीन भारताला जेरीस आणण्याचे प्रयत्न सर्व पातळ्यांवर करत असल्याचे दिसते. परंतु भारताने आपली खंबीर भूमिका कायम ठेवून या दबावाला भीक घातलेली नाही.