शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधील 'हायकमांड' संस्कृतीचा पुनर्विचार करण्याची गरज - कार्ति चिदंबरम

By admin | Updated: November 6, 2014 11:46 IST

काँग्रेसमधील 'हायकमांड' संस्कृतीचा पुनर्विचार करण्याची गरज असून प्रदेश काँग्रेस समितीलाही पुरेशे स्वातंत्र्य मिळायला हवे असे परखड मत काँग्रेसचे युवा नेते कार्ति चिदंबरम यांनी मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. ६ - काँग्रेसमधील 'हायकमांड' संस्कृतीचा पुनर्विचार करण्याची गरज असून प्रदेश काँग्रेस समितीलाही पुरेशे स्वातंत्र्य मिळायला हवे असे परखड मत काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ति चिदंबरम यांनी मांडले आहे. 
तामिळनाडूमधील काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला असून माजी केंद्रीय मंत्री व्ही. के.वासन यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे युवा नेते कार्ति चिदंबरम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसमधील कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजीच व्यक्त केली. 'तामिळनाडू काँग्रेसमध्ये आपले निर्णय स्वतः घेण्याची क्षमता असायला हवी. राज्यात काँग्रेसला सक्रीय होण्याची गरज असून दरवेळी निर्णय घेण्यासाठी दिल्लीकडे बघायची गरजेचे नाही असे विधान कार्ति चिदंबरम यांनी केले.  आम्ही पक्षाच्या राष्ट्रीय धोरणानुसारच काम केले पाहिजे, पण राज्य काँग्रेसलाही स्वातंत्र्य द्यायला हवे असे त्यांनी सांगितले.  कार्ति चिदंबरम यांच्या विधानामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. यापूर्वी पी. चिदंबरम यांनीदेखील काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्याती आवश्यकता व्यक्त केली होती.