शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

समाज सेवेसाठी धर्मांतराची आवश्यकता का ? - राजनाथ सिंह

By admin | Updated: March 23, 2015 16:55 IST

समाज सेवेसाठी धर्मांतराची आवश्यकता आहे का असा प्रश्न उपस्थित करतानाच धर्मांतरविरोधी कायद्यावर खुली चर्चा करण्याची आवश्यकता आहे असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २३ - समाज सेवेसाठी धर्मांतराची आवश्यकता आहे का असा प्रश्न उपस्थित करतानाच धर्मांतरविरोधी कायद्यावर खुली चर्चा करण्याची आवश्यकता आहे असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडले आहे. अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेसाठी आम्ही वाटेल ते करण्यास तयार आहोत असे आश्वासनही त्यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या नेत्यांना दिले आहे. 
सोमवारी दिल्लीत अल्पसंख्यांक आयोगाचे एक संमेलन पार पडले. या संमेलनात विविध अल्पसंख्यांक समुदायाच्या प्रतिनिधी सहभागी झाले. या संमेलनात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी धर्मांतरणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. संघाने मदर तेरेसा यांच्या सामाजिक कार्यामागे धर्मांतराचा हेतू असल्याचा वादग्रस्त दावा संघाने केला होता. यापार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचे विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आपण धर्मांतर केल्याशिवाय समाज कार्य करु शकत नाही का, धर्मांतराची गरजच काय, या सर्व मुद्द्यावर आपण खुली चर्चा का करत नाही असे असंख्य प्रश्नच त्यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या प्रतिनिधींसमोर उपस्थित केले. धर्मांतरासंदर्भात केंद्र सरकारसोबतच समाजाचीही काही जबाबदारी आहे असे त्यांनी नमूद केले.
अमेरिकेत जाऊन आपण त्या देशाची ओळख पुसू शकत नाही, मग आपण भारताची ओळख का बदलायची असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.