शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

समाज सेवेसाठी धर्मांतराची आवश्यकता का ? - राजनाथ सिंह

By admin | Updated: March 23, 2015 16:55 IST

समाज सेवेसाठी धर्मांतराची आवश्यकता आहे का असा प्रश्न उपस्थित करतानाच धर्मांतरविरोधी कायद्यावर खुली चर्चा करण्याची आवश्यकता आहे असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २३ - समाज सेवेसाठी धर्मांतराची आवश्यकता आहे का असा प्रश्न उपस्थित करतानाच धर्मांतरविरोधी कायद्यावर खुली चर्चा करण्याची आवश्यकता आहे असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडले आहे. अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेसाठी आम्ही वाटेल ते करण्यास तयार आहोत असे आश्वासनही त्यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या नेत्यांना दिले आहे. 
सोमवारी दिल्लीत अल्पसंख्यांक आयोगाचे एक संमेलन पार पडले. या संमेलनात विविध अल्पसंख्यांक समुदायाच्या प्रतिनिधी सहभागी झाले. या संमेलनात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी धर्मांतरणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. संघाने मदर तेरेसा यांच्या सामाजिक कार्यामागे धर्मांतराचा हेतू असल्याचा वादग्रस्त दावा संघाने केला होता. यापार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचे विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आपण धर्मांतर केल्याशिवाय समाज कार्य करु शकत नाही का, धर्मांतराची गरजच काय, या सर्व मुद्द्यावर आपण खुली चर्चा का करत नाही असे असंख्य प्रश्नच त्यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या प्रतिनिधींसमोर उपस्थित केले. धर्मांतरासंदर्भात केंद्र सरकारसोबतच समाजाचीही काही जबाबदारी आहे असे त्यांनी नमूद केले.
अमेरिकेत जाऊन आपण त्या देशाची ओळख पुसू शकत नाही, मग आपण भारताची ओळख का बदलायची असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.