शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

हवाई आघाडी मजबूत करण्यासाठी 200 लढाऊ विमानांची गरज

By admin | Updated: December 28, 2016 21:53 IST

देशाची हवाई आघाडी भक्कम करण्यासाठी किमान 200 लढाऊ विमानांची गरज असल्याचे मावळते हवाईदल प्रमुख अरुप राहा यांनी सांगितले

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 28 -  सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेली आगळीक आणि चीनची वाढत असलेली सैन्यशक्ती या पार्श्वभूमीवर देशाची हवाई आघाडी भक्कम करण्यासाठी किमान 200 लढाऊ विमानांची गरज असल्याचे मावळते हवाईदल प्रमुख अरुप राहा यांनी सांगितले. 
अरुप राहा हे येत्या 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी भारतील हवाई दलाच्या क्षमतेबाबत निरीक्षण नोंदवताना राहा म्हणाले, "36 राफेल विमाने ही संरक्षणासाठी पुरेशी नाहीत. तर देशाच्या सुरक्षेसाठी किमान 200 ते 250 विमानांची आवश्यकता आहे."
राहा यांनी पुढे सांगितले की,  "भारताकडे सध्या पुरेशा प्रमाणात  हेवीवेट विमाने आहेत. या गटातील  Su30 MKI  विमाने पुढील 30 ते 40 वर्षे सेवा देऊ शकतात. तसेच लाइटवेट वर्गातील विमानांचे प्रमाणही समाधानकारक आहे. सध्याच्या काळात राफेल विमाने सर्वोत्तम असून, ती बहुपयोगी आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी त्यांचा प्रभावी वापर होऊ शकतो.  पण अशी केवळ 36 विमानेच आपण मागवली आहेत. मात्र त्याहुन अधिक विमानांची गरज भारतीय हवाई दलाला आहे. 
( सैन्यात चर्चा नाही थेट कृती - अरुप राहा)