शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

पालिकेचे घोंगडे महावितरणच्या गळ्यात

By admin | Updated: March 19, 2016 00:03 IST

कंपनीकडून नकार : पालिकेला धाडणार पत्र

कंपनीकडून नकार : पालिकेला धाडणार पत्रनाशिक : पाणीपुरवठा काळात विद्युत मोटारींचा वापर करून पाणी ओढण्याच्या प्रकाराला आळा घालण्यास अपयशी ठरलेल्या महापालिकेने आपले घोंगडे महावितरणच्या गळी उतरविण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला आहे. पाणीपुरवठा काळात महावितरणने शहरात भारनियमन सुरू करावे अशी अजब सूचना पालिकेने पत्राद्वारे महावितरणला केली होती. या पत्राची खिल्ली उडवत महावितरणने पालिकेलाच उपाययोजना करण्याचा सल्ला दिला असल्याचे समजते. महापालिकेने शहरात आठवड्यातून दर गुरुवारी एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करतानाच पाणीबचत आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नाना तर्‍हेचे मार्ग अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. प्रामुख्याने, विद्युत मोटारी लावून पाणी खेचण्याचा प्रकार महापालिकेसाठी डोकेदुखी ठरल्याने त्याला पायबंद घालण्यासाठी विभागीय कार्यालयांना आदेश देण्यात आले होते. परंतु विभागीय कार्यालयाकडून सक्षमतेने कारवाई होत नसल्याने सहाही विभागातून केवळ १२५ विद्युत मोटारीच जप्त करण्यात आल्या तर केवळ दीड लाखांचा दंड करण्यात आला होता. एवढे होऊनही मोटारी लावून पाणी खेचण्याचा प्रकार सुरूच असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आल्याने पालिकेने जालीम तोडगा काढत महावितरणला भारनियमनाचे पत्र धाडले होते.शहरात होणार्‍या पाणीपुरवठा काळात पाइपलाइनमधून विद्युत मोटारी लावून पाण्याची चोरी होत असल्याने या काळात भारनियमन करण्यात यावे जेणेकरून पाणी उचलताच येणार नाही या महापालिकेच्या पत्राला महावितरणने धुडकावून लावले आहे. याबाबतचे अधिकृत पत्र अद्याप महापालिकेला धाडले नसले तरी मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रकारे भारनियमन करताच येणार नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. भारनियमानाचे राज्यसाखळीतील नियोजित वेळापत्रक तयार केले जाते. शहराचा प्रकार, शहर कोणत्या श्रेणीत आहे, भारनियनाची वेळ कशी असेल याचा अभ्यास करून भारनियमनाची वेळ ठरविली जाते. शिवाय वीजपुरवठा हा फिडर निहाय केला जातो. १०० ते हजार घरांपयंर्तचा एक फिडर असतो. अशावेळी दोन-चार मोटारी लावणार्‍यांसाठी इतर ग्राहकांवर अन्याय करता येणार नाही, असे महावितरणचे म्हणणे आहे. त्यामुळे महावितरणने पालिकेच्या पत्राला फारसे गांभीर्याने घेतले नसून आपली भूमिका निश्चित केली आहे; मात्र अद्याप पालिकेला तसे कळविण्यात आलेले नाही. महावितरणचे मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता चर्चा करून या पत्राबाबत शासनालाही कळविणार आहेत.