शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

जिल्हाधिकार्‍यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर राष्ट्रवादीचा थाळीनाद रहदारीचा खोळंबा : युती सरकारच्या निष्क्रियतेबद्दल संताप

By admin | Updated: October 29, 2015 22:02 IST

जळगाव : शेतकरी व विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत, महागाई वेगात वाढत आहे. मात्र कुंभकर्णी झोप घेत असलेले सरकार अजूनही जागे होत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी दुपारी थाळीनाद व हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर थाळीनाद करण्यात आला.

जळगाव : शेतकरी व विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत, महागाई वेगात वाढत आहे. मात्र कुंभकर्णी झोप घेत असलेले सरकार अजूनही जागे होत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी दुपारी थाळीनाद व हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर थाळीनाद करण्यात आला.
रा.कॉ.कार्यालयापासून मोर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयापासून जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ.सतीश पाटील, खासदार ईश्वरलाल जैन, माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, ॲड.रवींद्र भैया पाटील, महानगराध्यक्ष परेश कोल्हे, महिला आघाडीच्या प्रदेश पदाधिकारी मंगला पाटील, कल्पना पाटील, मीनल पाटील, शहराध्यक्ष प्रतिभा पाटील, दीपाली पाटील, पं.स.सदस्या लताबाई पाटील, विशाल देवकर, वाल्मीक पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्गावर दाखल झाले.
महामार्गावर थाळीनाद व घोषणाबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आकाशवाणी चौकात येत राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. या ठिकाणी थाळीनाद करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. मोदी सरकार हाय...हाय.., खंडणी सरकार हाय...हाय, एक वर्षात केले काय...खाली डोके वर पाय... अशी घोषणाबाजी सुरू केली.
महामार्गावर रहदारीचा खोळंबा
आंदोलकांनी जवळपास १५ ते २० मिनीटे राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजूच्या रहदारीचा खोळंबा झाला. या ठिकाणी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युती सरकारच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. २० मिनीटानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. प्रवेशद्वार बंद असल्याने या ठिकाणी रस्त्यावर आंदोलक एकत्र आले. या ठिकाणी पुन्हा वाहतुकीची कोंडी झाली.
केंद्र व राज्य शासनावर उगारला आसूड
आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले. या ठिकाणी पुन्हा थाळीनाद व ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी यांच्या दालनाच्या दिशेने वळविला. कार्यालयाच्या समोर बराच वेळ आंदोलक उभे होते.
जिल्हाधिकार्‍यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर आंदोलन
जिल्हाधिकारी या दालनात नसल्याची माहिती आंदोलकांना मिळाली. त्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी थेट दालनात प्रवेश केला. आंदोलकांनी जिल्हाधिकार्‍यांना तत्काळ बोलविण्याची मागणी केली. मात्र दहा मिनीटे जिल्हाधिकारी दालनात न आल्याने महिला पदाधिकार्‍यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर थाळीनाद आंदोलन सुरू केले. यावेळी शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी महिलांनी सुरू केली.