शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकार्‍यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर राष्ट्रवादीचा थाळीनाद रहदारीचा खोळंबा : युती सरकारच्या निष्क्रियतेबद्दल संताप

By admin | Updated: October 29, 2015 22:02 IST

जळगाव : शेतकरी व विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत, महागाई वेगात वाढत आहे. मात्र कुंभकर्णी झोप घेत असलेले सरकार अजूनही जागे होत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी दुपारी थाळीनाद व हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर थाळीनाद करण्यात आला.

जळगाव : शेतकरी व विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत, महागाई वेगात वाढत आहे. मात्र कुंभकर्णी झोप घेत असलेले सरकार अजूनही जागे होत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी दुपारी थाळीनाद व हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर थाळीनाद करण्यात आला.
रा.कॉ.कार्यालयापासून मोर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयापासून जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ.सतीश पाटील, खासदार ईश्वरलाल जैन, माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, ॲड.रवींद्र भैया पाटील, महानगराध्यक्ष परेश कोल्हे, महिला आघाडीच्या प्रदेश पदाधिकारी मंगला पाटील, कल्पना पाटील, मीनल पाटील, शहराध्यक्ष प्रतिभा पाटील, दीपाली पाटील, पं.स.सदस्या लताबाई पाटील, विशाल देवकर, वाल्मीक पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्गावर दाखल झाले.
महामार्गावर थाळीनाद व घोषणाबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आकाशवाणी चौकात येत राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. या ठिकाणी थाळीनाद करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. मोदी सरकार हाय...हाय.., खंडणी सरकार हाय...हाय, एक वर्षात केले काय...खाली डोके वर पाय... अशी घोषणाबाजी सुरू केली.
महामार्गावर रहदारीचा खोळंबा
आंदोलकांनी जवळपास १५ ते २० मिनीटे राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजूच्या रहदारीचा खोळंबा झाला. या ठिकाणी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युती सरकारच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. २० मिनीटानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. प्रवेशद्वार बंद असल्याने या ठिकाणी रस्त्यावर आंदोलक एकत्र आले. या ठिकाणी पुन्हा वाहतुकीची कोंडी झाली.
केंद्र व राज्य शासनावर उगारला आसूड
आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले. या ठिकाणी पुन्हा थाळीनाद व ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी यांच्या दालनाच्या दिशेने वळविला. कार्यालयाच्या समोर बराच वेळ आंदोलक उभे होते.
जिल्हाधिकार्‍यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर आंदोलन
जिल्हाधिकारी या दालनात नसल्याची माहिती आंदोलकांना मिळाली. त्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी थेट दालनात प्रवेश केला. आंदोलकांनी जिल्हाधिकार्‍यांना तत्काळ बोलविण्याची मागणी केली. मात्र दहा मिनीटे जिल्हाधिकारी दालनात न आल्याने महिला पदाधिकार्‍यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर थाळीनाद आंदोलन सुरू केले. यावेळी शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी महिलांनी सुरू केली.