शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

जिल्हाधिकार्‍यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर राष्ट्रवादीचा थाळीनाद रहदारीचा खोळंबा : युती सरकारच्या निष्क्रियतेबद्दल संताप

By admin | Updated: October 29, 2015 22:02 IST

जळगाव : शेतकरी व विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत, महागाई वेगात वाढत आहे. मात्र कुंभकर्णी झोप घेत असलेले सरकार अजूनही जागे होत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी दुपारी थाळीनाद व हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर थाळीनाद करण्यात आला.

जळगाव : शेतकरी व विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत, महागाई वेगात वाढत आहे. मात्र कुंभकर्णी झोप घेत असलेले सरकार अजूनही जागे होत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी दुपारी थाळीनाद व हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर थाळीनाद करण्यात आला.
रा.कॉ.कार्यालयापासून मोर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयापासून जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ.सतीश पाटील, खासदार ईश्वरलाल जैन, माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, ॲड.रवींद्र भैया पाटील, महानगराध्यक्ष परेश कोल्हे, महिला आघाडीच्या प्रदेश पदाधिकारी मंगला पाटील, कल्पना पाटील, मीनल पाटील, शहराध्यक्ष प्रतिभा पाटील, दीपाली पाटील, पं.स.सदस्या लताबाई पाटील, विशाल देवकर, वाल्मीक पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्गावर दाखल झाले.
महामार्गावर थाळीनाद व घोषणाबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आकाशवाणी चौकात येत राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. या ठिकाणी थाळीनाद करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. मोदी सरकार हाय...हाय.., खंडणी सरकार हाय...हाय, एक वर्षात केले काय...खाली डोके वर पाय... अशी घोषणाबाजी सुरू केली.
महामार्गावर रहदारीचा खोळंबा
आंदोलकांनी जवळपास १५ ते २० मिनीटे राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजूच्या रहदारीचा खोळंबा झाला. या ठिकाणी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युती सरकारच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. २० मिनीटानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. प्रवेशद्वार बंद असल्याने या ठिकाणी रस्त्यावर आंदोलक एकत्र आले. या ठिकाणी पुन्हा वाहतुकीची कोंडी झाली.
केंद्र व राज्य शासनावर उगारला आसूड
आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले. या ठिकाणी पुन्हा थाळीनाद व ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी यांच्या दालनाच्या दिशेने वळविला. कार्यालयाच्या समोर बराच वेळ आंदोलक उभे होते.
जिल्हाधिकार्‍यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर आंदोलन
जिल्हाधिकारी या दालनात नसल्याची माहिती आंदोलकांना मिळाली. त्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी थेट दालनात प्रवेश केला. आंदोलकांनी जिल्हाधिकार्‍यांना तत्काळ बोलविण्याची मागणी केली. मात्र दहा मिनीटे जिल्हाधिकारी दालनात न आल्याने महिला पदाधिकार्‍यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर थाळीनाद आंदोलन सुरू केले. यावेळी शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी महिलांनी सुरू केली.