शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

नवज्योत सिद्धूचे मंत्रिपद वाचले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 04:00 IST

३० वर्षांपूर्वीच्या खटल्यात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने, पंजाबच्या काँग्रेस सरकारमधील पर्यटनमंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचे मंत्रिपद वाचले.

नवी दिल्ली : ३० वर्षांपूर्वीच्या खटल्यात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने, पंजाबच्या काँग्रेस सरकारमधील पर्यटनमंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचे मंत्रिपद वाचले. दोन वर्षांहून अधिक शिक्षा झाली असती, तर सिद्धूंना राजीनामा द्यावा लागला असता.सिद्धू व त्यांचे मित्र रूपिंदर सिंग संधू २७ डिसेंबर १९८८ रोजी पतियाळा जिल्ह्यात महामार्गावर मोटार उभी करून खरेदी करायला गेले होते. गुरनाम सिंग या मोटारचालकाने त्यास आक्षेप घेतला. त्या वेळी रागाच्या भरात सिद्धू व संधू यांनी गुरनाम यांना बेदम मारहाण केली. त्यात त्यांचे निधन झाले. या खटल्यात सत्र न्यायालयाने सिद्धू व संधू यांना निर्दोष मुक्त केले. मात्र, उच्च न्यायालयाने सिद्धू यांना सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी ठरवून, तीन वर्षांचा कारावास व एक लाख रुपये दंड ठोठावला. सर्वोच्च न्यायालयात अपील करेपर्यंत जामीन दिल्याने सिद्धू तुरुंगात गेले नाहीत.याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दोन अपिले केली गेली. खंडपीठाने सिद्धू यांना भादंवि कलम ३२३ अन्वये किरकोळ दुखापत करण्याच्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरवून एक हजार रुपये दंड ठोठावला.> एक हजार रुपये दंड ठोठावून न्यायालयाने थट्टा करीत मयताच्या जखमांवर मीठ चोळले आहे. सिद्धू ‘सेलिब्रिटी’ असल्याने मवाळ शिक्षा दिली गेली.- अभिजीत, गुरनाम सिंग यांचा कुटुंबीय> जनतेच्या प्रार्थनेमुळेच मी ताठ मानेने बाहेर पडलो. माझे आयुष्य सर्वस्वी जनतेच्या हाती सोपवित आहे, असा संदेश राहुलजी व सोनियाजी यांनी पाठविला आहे.- नवज्योत सिंग सिद्धू