शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

नवज्योत सिद्धूचे मंत्रिपद वाचले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 04:00 IST

३० वर्षांपूर्वीच्या खटल्यात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने, पंजाबच्या काँग्रेस सरकारमधील पर्यटनमंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचे मंत्रिपद वाचले.

नवी दिल्ली : ३० वर्षांपूर्वीच्या खटल्यात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने, पंजाबच्या काँग्रेस सरकारमधील पर्यटनमंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचे मंत्रिपद वाचले. दोन वर्षांहून अधिक शिक्षा झाली असती, तर सिद्धूंना राजीनामा द्यावा लागला असता.सिद्धू व त्यांचे मित्र रूपिंदर सिंग संधू २७ डिसेंबर १९८८ रोजी पतियाळा जिल्ह्यात महामार्गावर मोटार उभी करून खरेदी करायला गेले होते. गुरनाम सिंग या मोटारचालकाने त्यास आक्षेप घेतला. त्या वेळी रागाच्या भरात सिद्धू व संधू यांनी गुरनाम यांना बेदम मारहाण केली. त्यात त्यांचे निधन झाले. या खटल्यात सत्र न्यायालयाने सिद्धू व संधू यांना निर्दोष मुक्त केले. मात्र, उच्च न्यायालयाने सिद्धू यांना सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी ठरवून, तीन वर्षांचा कारावास व एक लाख रुपये दंड ठोठावला. सर्वोच्च न्यायालयात अपील करेपर्यंत जामीन दिल्याने सिद्धू तुरुंगात गेले नाहीत.याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दोन अपिले केली गेली. खंडपीठाने सिद्धू यांना भादंवि कलम ३२३ अन्वये किरकोळ दुखापत करण्याच्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरवून एक हजार रुपये दंड ठोठावला.> एक हजार रुपये दंड ठोठावून न्यायालयाने थट्टा करीत मयताच्या जखमांवर मीठ चोळले आहे. सिद्धू ‘सेलिब्रिटी’ असल्याने मवाळ शिक्षा दिली गेली.- अभिजीत, गुरनाम सिंग यांचा कुटुंबीय> जनतेच्या प्रार्थनेमुळेच मी ताठ मानेने बाहेर पडलो. माझे आयुष्य सर्वस्वी जनतेच्या हाती सोपवित आहे, असा संदेश राहुलजी व सोनियाजी यांनी पाठविला आहे.- नवज्योत सिंग सिद्धू