शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

१३०० बचत गटांना १६ कोटींचे वाटप राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान : ७९१ बचतगटांना कर्जाची प्रतिक्षा

By admin | Updated: February 22, 2016 00:03 IST

जळगाव : राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानातंर्गत या वर्षभरात दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना रोजगारक्षम बनविण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी १३०० बचत गटांना १५ कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली आहे. तर ७९१ बचतगट कर्ज मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.

जळगाव : राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानातंर्गत या वर्षभरात दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना रोजगारक्षम बनविण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी १३०० बचत गटांना १५ कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली आहे. तर ७९१ बचतगट कर्ज मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.
केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे रुपांतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात करण्याच्या निर्णयानुसार राज्यात १८ जुलै २०११ पासून स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेचे राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानात रुपांतर झाले आहे.
दारिद्रय रेषेखालील कुटुंबांचे उत्पन्न वाढविणे हा उद्देश
वंचित दारिद्रय रेषेखालील कुटुंबांची स्वयंरोजगारीची क्षमता वाढविणे, स्वयंरोजगारींना लाभदायक क्षमतावृध्दी, स्वयंरोजगार व कौशल्यावर आधारित रोजगाराची संधी उपलब्ध करुन स्वरोजगारीचे कायम स्वरुपी उत्पन्न वाढवुन त्यांना दारिद्रय रेषेच्या वर आणने हा मुख्य उद्देश आहे.

२६ कोटीच्या कर्ज वाटपाचे उद्दिट्य
योजनेतंर्गत जिल्ह्यातील दोन हजार १०१ बचत गटांना २६ कोटी २५ लाख रुपये वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आहे. मात्र जिल्हाभरातील दोन हजार १२० बचत गटांनी तब्बल २९ कोटी २२ लाखांचे कर्जप्रकरणे विविध बँकांमध्ये सादर केले आहेत.

१४७१ बचतगटांचे प्रकरणे मंजूर
या योजनेतंर्गत बचत गटांतर्फे सादर करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणांपैकी एक हजार ४७१ प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्यात या बचत गटांना १८ कोटी ५४ लाख ९५ हजार रुपयांची रक्कम मंजुर करण्यात आली. जानेवारी महिन्यापर्यंत त्यातील १३०० प्रकरणांना १५ कोटी ९९ लाखांची रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

इन्फो-
२९ बचत गटांचे प्रस्ताव नाकारले
या योजनेतंर्गत दाखल केलेल्या २९ बचत गटांचे प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. या बचत गटांनी ४३ लाख ७० हजार रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. यात जळगाव, मुक्ताईनगर व रावेर या तालुक्यांमधील बचत गटांची संख्या सर्वाधिक आहे. त्या पाठोपाठ जामनेर व पाचोरा या तालुक्यातील बचत गटांचे कर्जप्रकरणे नाकारण्यात आले आहेत.