सुधीर लंके, मुंबई - मोदी लाटेने देशात सत्तांतर तर घडविलेच पण पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणार्या नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी (राष्टÑवादी), बसपा व भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) या तीन राष्टÑीय पक्षांची मान्यताही एकाच दणक्यात धोक्यात आणली आहे. या पक्षांना आवश्यक तेवढ्या जागा व मते मिळालेली नसल्याने त्यांची राष्टÑीय मान्यता निवडणूक आयोगाकडून गोठवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात केवळ भाजपा, काँग्रेस व माकपा हे तीनच राष्ट्रीय पक्ष उरतील. लोकसभेत बसपाला एकही जागा मिळू शकलेली नाही. उत्तर प्रदेशची १९.६ टक्के मते वगळता त्यांना इतर राज्यांत सहा टक्के मते नाहीत. लोकसभेत कामगिरी नसेल तर राष्टÑीय पक्षाने किमान चार राज्यांत राज्य पक्षाचा दर्जा राखायला हवा. पण बसपाची केवळ मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये राज्य पक्षाच्या दर्जाएवढी कामगिरी आहे. राष्टÑवादी काँग्रेसचीही हीच अवस्था आहे. राष्टÑवादीचे सहा खासदार आहेत. मात्र बिहारमध्ये त्यांना आवश्यक मते मिळाली नाहीत. लक्षद्वीपमधून एक खासदार आला आहे. मात्र हा केंद्रशासित प्रदेश असल्याने तो राज्यामध्ये गणला जात नाही, असे आयोगाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादी, बसपा आणि भाकपाची राष्ट्रीय मान्यता धोक्यात
By admin | Updated: May 21, 2014 03:03 IST