शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

कचरा वेचणाऱ्यांनाही देणार राष्ट्रीय पुरस्कार

By admin | Updated: July 4, 2015 02:32 IST

देश स्वच्छ ठेवण्यात कचरा वेचणाऱ्यांचे योगदान लक्षात घेत त्यांच्या सेवेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : देश स्वच्छ ठेवण्यात कचरा वेचणाऱ्यांचे योगदान लक्षात घेत त्यांच्या सेवेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी सांगितले.देशात कचरा वेचणारे लाखो हात असून या क्षेत्रानेच देशाला वाचविले आहे. ते देशाच्या स्वच्छतेचे चांगले काम करीत असून मी त्यांच्या प्रयत्नांना मान्यता देण्याचे ठरविले आहे. आम्ही त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करू, असे ते येथे एका कचरा व्यवस्थापन कार्यक्रमात म्हणाले. कचरा उचलण्यात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तिघांना दीड लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार असून कचरा व्यवस्थापनात नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या तीन संघटनांचीही पुरस्कारासाठी निवड केली जाईल. महापालिकांनी कचरा व्यवस्थापनात वैज्ञानिक पद्धत अवलंबावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करणारी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसारखी संस्था स्थापन केली जावी. देशात दरवर्षी ६.२ कोटी टन कचरा निर्माण होतो. २०३० साली हे प्रमाण १६.५ कोटी टनांवर तर २०५० पर्यंत ४५ कोटी टनांपर्यंत जाईल. देशातील ६८ टक्के कचरा आणि घाणीवर प्रक्रिया केली जात नाही, ही चिंतेची बाब आहे. कचरा व्यवस्थापनाच्या नव्या मसुद्यात ही चिंता सोडविण्यावर भर देण्यात आला आहे, असेही जावडेकर म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)