शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कचरा वेचणाऱ्यांनाही देणार राष्ट्रीय पुरस्कार

By admin | Updated: July 4, 2015 02:32 IST

देश स्वच्छ ठेवण्यात कचरा वेचणाऱ्यांचे योगदान लक्षात घेत त्यांच्या सेवेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : देश स्वच्छ ठेवण्यात कचरा वेचणाऱ्यांचे योगदान लक्षात घेत त्यांच्या सेवेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी सांगितले.देशात कचरा वेचणारे लाखो हात असून या क्षेत्रानेच देशाला वाचविले आहे. ते देशाच्या स्वच्छतेचे चांगले काम करीत असून मी त्यांच्या प्रयत्नांना मान्यता देण्याचे ठरविले आहे. आम्ही त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करू, असे ते येथे एका कचरा व्यवस्थापन कार्यक्रमात म्हणाले. कचरा उचलण्यात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तिघांना दीड लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार असून कचरा व्यवस्थापनात नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या तीन संघटनांचीही पुरस्कारासाठी निवड केली जाईल. महापालिकांनी कचरा व्यवस्थापनात वैज्ञानिक पद्धत अवलंबावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करणारी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसारखी संस्था स्थापन केली जावी. देशात दरवर्षी ६.२ कोटी टन कचरा निर्माण होतो. २०३० साली हे प्रमाण १६.५ कोटी टनांवर तर २०५० पर्यंत ४५ कोटी टनांपर्यंत जाईल. देशातील ६८ टक्के कचरा आणि घाणीवर प्रक्रिया केली जात नाही, ही चिंतेची बाब आहे. कचरा व्यवस्थापनाच्या नव्या मसुद्यात ही चिंता सोडविण्यावर भर देण्यात आला आहे, असेही जावडेकर म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)