शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतरही 'या' गावात पोहोचली नाही वीज, जाणून घ्या पूर्ण कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 12:00 IST

स्वातंत्र्याला 70हून अधिक वर्षं लोटली, तरीही देशातील या गावात अद्याप वीज पोहोचू शकलेली नाही.

त्रिशूलीः स्वातंत्र्याला 70हून अधिक वर्षं लोटली, तरीही देशातील या गावात अद्याप वीज पोहोचू शकलेली नाही. छत्तीसगडमधल्या त्रिशूली गावात अद्यापही वीज पोहोचलेली नाही. त्रिशूली गावात जवळपास 100 घरं आहेत. परंतु त्या गावात प्रशासनाला आजपर्यंत वीज पोहोचवता आलेली नाही. स्थानिकांनी आता कलेक्टर यांना पत्र लिहून वीज पुरवण्याची मागणी केली आहे.पत्रात गावकरी लिहितात, आजपर्यंत आमच्या गावात वीज पोहोचू शकलेली नाही. इथे जवळपास 100हून अधिक घरं आहेत. आमची मुलं वीज नसल्यानं सूर्यास्त झाल्यानंतर अभ्यास करत नाहीत. त्यानंतर बलरामपूरचे जिल्हाधिकारी संजीव कुमार झा म्हणाले, वीज अद्यापपर्यंत पोहोचलेली नसलेल्या गावांत सर्व्हे करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माजरा-टोला विद्युतीकरण योजनेंतर्गत त्रिशूली गावात वीज पोहोचवणार आहेत. तसेच त्रिशूलीसह इतर गावांमध्येही वीज पोहोचवली जाईल.छत्तीसगडमधील 122 गावांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नसल्याची माहिती गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आली होती. बस्तरमधील ज्या बामदई गावातून मुख्यमंत्र्यांनी वीजपुरवठ्याचा उत्सव सुरू केला तिथेच अंधार आहे. तर गेल्या वर्षी मोदी सरकारनं देशातल्या सर्व गावांत वीज पोहोचवल्याचा दावा केला होता. देशात 100% वीज पुरवठा झाला आहे. सरकारने एक हजार दिवसांत 18 हजार 452 गावांमध्ये वीज पोहोचवली आहे, असा दावा मोदी सरकारनं केला होता. परंतु अद्यापही काही अशी गावं आहेत, ज्या गावांत वीज आणि रस्त्यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधा पोहोचलेल्या नाहीत. तर दुसरीकडे डेटा एजन्सी ब्लूमबर्ग यांनी सरकारी आकडेवारीच्या हवाल्याने म्हटले होते की, 2014नंतर 4 वर्षांमध्ये वीजपुरवठा पोहोचवलेल्या 19,727 गावांपैकी फक्त 8% गावांमधील घरातच वीज पोहोचली आहे. उर्वरित 92% गावांतील बहुतांश घरे ही अद्याप अंधारात आहेत. यात मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार, पंजाब आणि महाराष्ट्रातील गावांचा समावेश आहे.   

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड