शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीतून नाशिककरांची सुटका

By admin | Updated: January 6, 2015 00:07 IST

हटले धुके : थंडीची तीव्रता झाली कमी

हटले धुके : थंडीची तीव्रता झाली कमीनाशिक : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धुक्याच्या पखरणीतून आणि कडाक्याच्या थंडीतून सोमवारी नाशिककरांची सुटका झाली. किमान तपमानात वाढ झाली नसली, तरी धुके हटल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प˜्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाचे वातावरण तयार झाले होते. नाशिकमध्ये तर ग्रामीण भागात गारपीटही झाली होती. राज्यातील सर्वात कमी तपमानाची नोंद मध्यंतरीच्या काळात नाशिकमध्ये करण्यात आली होती. पावसामुळे आलेली थंडीची लाट नंतर कमी होईल अशी अपेक्षा असताना, थंडीची तीव्रता कायम राहिली. पाऊस थांबल्यानंतर वाढलेल्या आर्द्रतेचा फटका नाशिककरांना बसला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण शहरच रात्रीपासून धुक्यात हरवून जात होते. सकाळच्या सुमारास बाहेर पडलेल्या नागरिकांना धुक्यातून वाट काढीत मार्गक्रमण करावे लागत होते. यासाठी वाहनांचे लाईटही सुरूच ठेवावे लागत होते. या धुक्यामुळे थेट जमिनीवर सूर्यप्रकाश येण्यासही अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे सकाळी १० वाजेपर्यंत धुके दाटलेले असायचे. त्या धुक्यातून प्रवास करताना त्यातील दवबिंदूंचा स्पर्श शरीराला व्हायचा. रविवारपर्यंत धुक्याचे वलय कायम होते. सोमवारपासून मात्र त्यात बदल होऊ लागला. सोमवारच्या सकाळी धुक्याचे प्रमाण कमी झाल्याने थंडीची तीव्रताही कमी झाली. परिणामी सूर्यकिरणे थेट जमिनीवर पोहोचू लागल्याने गारवाही कमी झाला. सोमवारी रात्रीच्या सुमारास थंडी कमी झाल्याने शहराची थंडीतून सुटका झाली. आगामी काही दिवस तपमान १२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार असले, तरी स्वच्छ वातावरणामुळे थंडी वाढण्याची शक्यता नसल्याचे वेधशाळेने कळविले आहे.