शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

‘व्यापमं’पेक्षाही नर्मदा घोटाळा मोठा - सिंघवी

By admin | Updated: October 20, 2016 04:42 IST

व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापमं) कथित घोटाळ््यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सरकार नव्या घोटाळ््यात अडकणार असल्याचे दिसत आहे.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापमं) कथित घोटाळ््यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सरकार नव्या घोटाळ््यात अडकणार असल्याचे दिसत आहे. नर्मदा विस्थापितांसाठी असलेली मदतीची रक्कम राज्य सरकारमधील लोकांच्या मदतीने लुटल्या गेल्याचा उल्लेख एस. एस. झा आयोगाने अहवालात केला असून, तो अहवाल प्रसिद्ध होऊ नये म्हणून राज्य सरकार होईल तेवढा प्रयत्न केला होता. हा अहवाल जाहीर होऊ नये यासाठी सरकार उच्च न्यायालयाचीही पायरी चढले. परंतु न्यायालयाने झा आयोगाचा अहवाल प्रकाशित करून तो जाहीर करण्याचा आदेश देऊन सरकारला झटका दिला. अहवालात जे सत्य समोर आले त्याने डोळे विस्फारतात. अहवालाने म्हटले की, नर्मदाच्या विस्थापितांचे पुनर्वसन आणि त्यांच्या मदतीसाठी उपलब्ध करण्यात आलेले हजारो कोटी रुपये सरकारमध्ये असलेल्या लोकांच्या मदतीने लुटले गेले. हा मुद्दा काँग्रेसने मोदी सरकार आणि भाजपच्या विरोधात मोठे राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ‘व्यापमं’पेक्षाही नर्मदा घोटाळा फार मोठा असल्याचे व त्यात भाजप नखशिखांत बुडाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी पुनर्वसन आणि मदतीशी ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना हे पैसे वाटले गेले, असा आरोप केला. >व्यक्तीच अस्तित्वात नाही तर मग पैसा गेला कुठे?ज्याला पैसा दिला गेला ती व्यक्तीच अस्तित्वात नाही तर मग पैसा गेला कुठे, असा प्रश्न सिंघवी यांनी विचारला. बनावट कागदपत्रे कोणी तयार केली? आमचे सरकार प्रामाणिक असल्याचा दावा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आयोगाबद्दल अजून काहीच का बोलत नाहीत?, असे ते म्हणाले.