नरखेड....
By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST
नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात भ्रष्टाचार
नरखेड....
नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात भ्रष्टाचारमन्नाथ (खेडी) येथील प्रकार : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत नाहीनरखेड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये २०१४ ला झालेल्या गारपीट व अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहगाव (भदाडे) येथे प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांना अनुदान देण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. परंतु, संबंधित अधिकारी व तलाठ्यांनी संधी साधून खोटी नुकसान दाखवून अनुदान वाटप केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसानग्रस्त शेतावर वा प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून माहिती न घेता मर्जीतील व पैसे देणाऱ्या शेतकऱ्यांची नावे नुकसानग्रस्तांच्या यादीत समाविष्ट केली. तसेच अनुदान वाढवून दिले असल्याचा प्रकार तालुक्यातील मन्नाथ (खेडी) येथे उघडकीस आला आहे. यासंदर्भात माहिती अधिकारात उमेश सोमकुवर यांनी कार्यालयाचे हेलपाटे मारल्यानंतर या प्रकरणातील गांभीर्य उघड झाले आहे. याबाबत पितळ उघडे पळल्यानंतर तलाठी के.के. कोरे यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली आहे. सन २०१३-२०१४ या वर्षात अतिवृष्टी व गारपीट झाल्याने शासनाने नुकसानीचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले. या अनुदान वाटपात मोठा घोळ उघडकीस आला. मन्नाथ खेडी, गोवार, गोंदी या गावातील ज्या शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले, त्यांची नावे अनुदान वाटप यादीत दिसले नाही. मात्र, ज्यांचे नुकसान झाले नाही, त्यांना १०० टक्के अनुदान देण्यात आले. याबाबत उमेश सोमकुवर यांनी तहसीलदार यांच्याकडे माहिती अधिकारात अपील दाखल केली.