शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जयंतीच्या आडून ‘नरेंद्र’ राज्यसभेसाठी दक्ष!

By admin | Updated: April 16, 2015 23:56 IST

अनेक वर्षे काँग्रेसशी संधान असलेले अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपुआची सत्ता जाताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सलगी वाढविली आहे.

रघुनाथ पांडे - नवी दिल्लीअनेक वर्षे काँग्रेसशी संधान असलेले अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपुआची सत्ता जाताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सलगी वाढविली आहे. राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्यत्व मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य जयंतीच्या निमित्ताने त्यांची धडपड असल्याचे भाजपतील जाणकार सांगतात.नोव्हेंबर महिन्यात मुंबईचे डॉ. अशोक गांगुली, पुढच्या वर्षीच्या मार्चमध्ये ख्यातनाम कवी जावेद अख्तर व त्याच महिन्यात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत पूर्ण होत आहे. डॉ. मुणगेकर यांच्या जागी जाण्यास डॉ. जाधव उत्सुक आहेत. घटनेच्या कलम ८० नुसार विविध क्षेत्रातील १२ जणांना राज्यसभेवर नामनियुक्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, पंतप्रधान त्या नावांची शिफारस करतात. या पार्श्वभूमीवर संघ व भाजप यांच्यात समन्वय तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क अशी जबाबदारी असलेले संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी तसेच सहसरकार्यवाह कृष्ण गोपाल यांच्याशी जाधव यांनी सूत जमविले आहे. या तिघांशी संबंधित सूत्राने सांगितले की, दोन वर्षांपासून डॉ. जाधव संघाकडे ओढले गेले. मुंबईतील एका कार्यक्रमात ते भैयाजी जोशींसोबतही होते. मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर जाधव यांनी, ‘देशाला लांबपल्ल्याची अर्थ निती देणारा अर्थ संकल्प,’ या शब्दात कौतुक केल्याने ते काँग्रेसच्या डोळ््यात आले. तर त्याच्या आधारे जाधव यांचे नाव अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या गुडबूकमध्ये गेले. डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने संघाला दलितांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमांसाठी डॉ. जाधव यांच्यासारखा जाणकार आपल्या कामी येईल, असे ठरवून त्यांच्यावर लक्ष केंद्रीत केले. डॉ. जाधव हे अर्थतज्ज्ञ, रिझर्व्ह बॅकेचे आर्थिक सल्लागार व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू असले तरी त्यांच्यावर ते काँग्रेस गोटातील असल्याचा शिक्का आहे. मागील दीड दशक काँग्रेससोबत एवढेच नव्हें तर पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या माध्यमातून नियोजन आयोग व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय सल्लागार परिषदेवर त्यांची वर्णी लावली होती. लोकसभा निवडणुकीत लातूरची उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते.