शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

काळ्या पैशावर अंकुश आणणारच - नरेंद्र मोदी

By admin | Updated: September 2, 2016 22:17 IST

सरकारचं मुल्यांकन केलं जाईल तेव्हा आम्ही सत्तेत येण्याआधी देशातील परिस्थिती काय होती, आधीचं सरकार काय करत होतं या गोष्टीदेखील लक्षात घ्याव्यात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत

- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - जनताच सरकारचं मुल्यांकन करते. पण जेव्हा मुल्यांकन केलं जाईल तेव्हा आम्ही सत्तेत येण्याआधी देशातील परिस्थिती काय होती, आधीचं सरकार काय करत होतं या गोष्टीदेखील लक्षात घ्याव्यात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. न्यूज 18 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर मत मांडत चर्चा केली. न्यूज 18 चे समूह संपादक राहुल जोशी यांनी ही मुलाखत घेतली.
 
भाजपा सरकार जेव्हा सत्तेत आलं तेव्हा लोकांमध्ये निराशा होता. सत्तेत आल्यानंतर सर्वात अगोदर ही निराशा घालवावी यासाठी प्रयत्न केला. विश्वास निर्माण करण्यासाठी कृतीची गरज आहे. दोन वर्षांमध्ये फक्त भारतीयांमध्ये नाही तर जगभरामध्ये विश्वास निर्माण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. 
 
पंतप्रधान मोदींनी यावेळी जीएसटीवर बोलताना जीएसटीमुळे कारभारात पारदर्शकता येईल. जीएसटीमुळे जकातीला मूठमाती मिळेल तसंच  जीएसटीमुळे देशाचा महसूल वाढेल. राज्य आणि केंद्रामधील अविश्वासही थांबेल असा दावा केला आहे. कर भरण्याची प्रक्रिया इतकी मोठी आहे की काही लोक त्यामुळे कर भरत नाहीत. जीएसटीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल आणि करप्रणाली सुलभ होईल. करप्रणालीतील बदलांमुळे मोठी क्रांती होईल असंही मोदी बोलले आहेत. 
 
अर्थव्यवस्थेवरुन होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरही नरेंद्र मोदी बोलले आहेत. सत्तेत आल्यानंत पहिलं बजेट सादर करण्याआधी देशातील आर्थिक परिस्थिती सर्वांसमोर ठेवायला हवी होती असं मला वाटत होतं. राजकारण सांगतं होतं हे सगळं समोर आणलं पाहिजे मात्र राष्ट्रनीती असं करण्यापासून थांबवत होतं. राष्ट्रनीती सांगत होती याचा राजकारणात फायदा होईल मात्र देशाचं नुकसान होईल. राष्ट्रनीतीमुळे मी शांत राहिलो. आमचं राजकीय नुकसान झालं, आमच्यावर टीकाही झाली पण मी शांत राहिलो असं सांगताना मोदींनी काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.
 
नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर बोलताना पुन्हा एकदा काळ्या पैशावर अंकुश आणणारच असं सांगितलं आहे. कायदा कायद्याचं काम करत आहे. सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळाने सर्वात अगोदर काळ्या पैशासंबंधी निर्णय घेतला होता. काळा पैसा देशाबाहेर जाणार नाही यासाठी आम्हीच नियम तयार केले आहेत. काळ्या पैशांचा खेळ लवकरच संपेल असा दावा मोदींनी केला आहे. 
 
दलितांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर बोलताना मोदींनी समाजाप्रती अशा घटना अशोभनीय आहेत असं सांगत निंदा केली. समाजाप्रती अशा घटना अशोभनीय आहेत. कोणत्याही सभ्य समाजाला या घटना शोभा देत नाहीत. मात्र हा राज्याच्या सुरक्षेचा मुद्दा असतो हेदेखील लक्षात ठेवावं. दरवेळी मोदींच्या गळ्यात टाकण्याची गरज नाही. दलित, आदिवासी आणि इतर अत्याचाराच्या घटनांमध्ये गत सरकारच्या तुलनेत कमी झाल्या आहेत.सामाजिक विकृतीचा विनाश करायला हवा. सामाजिक प्रश्नांवर राजकारण करणं चुकीचं आहे सांगताना नेत्यांनी बेजबाबदार वक्तव्य टाळावीत असा सल्ला मोदींनी दिला आहे. 
 
दलितांच्या विकासासाठी आम्ही कटीबद्द, डॉ आंबेडकरांची पंचतीर्थ स्थापली. मात्र विरोधकांना हे पचलं नाही अशी टीका मोदींनी केली आहे. 
 
काश्मीरची समस्या नवी नाही.  काश्मीरला विकास आणि विश्वास हवा आहे. काश्मीरमधील तरुण योग्य मार्गाने जाईल असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. 
 
मी आज जे काही आहे त्यामध्ये प्रसारमाध्यमांचा मोठा भाग. माझ्याबद्दलच्या तक्रारींना त्यांना हक्क आहे. टीका झाली नाही तर लोकशाही चालूच शकत नाही. प्रसारमाध्यमांची धावपळ इतकी चालू आहे की रिसर्च न करता बातम्या छापल्या जात आहेत. सरकारमध्ये भीती राहिली पाहिजे तरच काम होईल, देशाचं भलं होईल असं मोदी बोलले आहेत.