शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

नरेंद्र मोदींनी आचरणात आणली लोकांची ही सूचना

By admin | Updated: July 17, 2017 18:03 IST

एखादा नेता कोणत्याही समारंभ अथवा कार्यक्रमाला गेल्यास पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करण्याचा शिष्टाचार आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 17 - एखादा नेता कोणत्याही समारंभ अथवा कार्यक्रमाला गेल्यास पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करण्याचा शिष्टाचार आहे. मात्र लवकरच हा शिष्टाचार इतिहासजमा होणार आहे. कारणंही तसंच आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशांतर्गत दौ-यावेळी पुष्पगुच्छ देऊ नका, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना दिले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींच्या अ‍ॅपचं लाँचिंग करण्यात आलं, त्या अ‍ॅपवर मोदींनी पुष्पगुच्छ स्वीकारू नये, अशा आशयाच्या सूचना लोकांकडून प्राप्त झाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट 2016ला देशाला संबोधित केलं होतं. त्यापार्श्वभूमीवर सूचना मागवण्यात आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही लोकांकडून पुष्पगुच्छ का स्वीकारता ? तुम्ही आणि बाकीचे मंत्री पुष्पगुच्छ स्वीकारणं बंद करू शकत नाहीत का ? फक्त तुम्ही जरी असं केलंत तर दीड कोटी रुपये वाचतील, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना आशिष आनंद यानं दिला होता. पंतप्रधान मोदी 9 ऑगस्ट 2016ला मध्य प्रदेशमध्ये गेले होते तेव्हा त्यांना 10 ते 15 पुष्पगुच्छ देण्यात आले. ते स्वीकारल्यानंतर मोदींनी लगेच पुष्पगुच्छ आपल्या सुरक्षारक्षकांकडे सोपवले. "त्या फुलांचा सुगंध घेता येईल, त्याआधीच दुसरा पुष्पगुच्छ तुमच्या हातात होता. तुम्ही रोज हजारो लोकांना भेटता, जे तुमच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ देतात", असं आशिष आनंद यांनी लिहिलं होतं. "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षातील 300 दिवसांत रोज 10 लोकांची भेट घेतली तर किमान 10 ते 15 पुष्पगुच्छ ते स्वीकारतील. एका पुष्पगुच्छाची किंमत 500 रुपये धरली तर वर्षाला 1.5 कोटी रुपये खर्च होतात", असंही आशिष आनंद यांनी लिहिलं होतं. "पुष्पगुच्छ स्वीकारण्यापेक्षा त्याचे पैसे जमा केल्यास तो पैसा विकासकामात वापरू शकतो", असं आशिष आनंद यांचं म्हणणं होतं.

आणखी वाचा(पुष्पगुच्छांऐवजी भेट म्हणून पुस्तके द्यावीत!)(पुष्पगुच्छ स्वीकारले नाहीत तर करोडो वाचतील, पंतप्रधान मोदींना सल्ला)गेल्या काही दिवसांपूर्वी पी. एन. पणिकर फाऊंडेशनच्या ‘वाचन महिना’ कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. मोदी म्हणाले, ‘‘चांगल्या ज्ञानाचा पाया असल्यास त्यातून चांगल्या समाजाची दर्जेदार बांधणी होईल.’’ डिजिटल साक्षरतेवर भर देऊन मोदी म्हणाले की, ‘‘फाऊंडेशनने आता डिजिटल साक्षरतेवर भर दिला त्याबद्दल मला आनंद वाटतो. आज ही गरज आहे. अशा बांधिलकीने होत असलेल्या सामाजिक चळवळी मला मोठ्या आशा वाटतात. या अशा कामातून मोठे बदल घडतील.’’ तरुण पिढीने वाचनाची शपथ घ्यावी आणि इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहन द्यावे. चांगले वाचणारी पिढी भारताच्या विकासात हातभार लावील, असेही मोदी म्हणाले. वाचनासारखा दुसरा मोठा आनंद नाही आणि ज्ञानापेक्षा मोठा मित्र नाही, असे त्यांनी म्हटले. शुभेच्छा देताना लोकांनी पुष्पगुच्छांऐवजी पुस्तके द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले. साक्षरता आणि शिक्षणात केरळच्या कामगिरीचे कौतूक करताना मोदी म्हणाले की,‘‘ देशासाठी केरळ हे या दोन्ही क्षेत्रांत मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान बनले आहे.’’ 100 टक्के साक्षर बनणारे केरळ हे देशातील पहिले राज्य आहे.