शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

इन्फोसिसमधल्या कारभाराबाबत नारायण मूर्ती दुःखी

By admin | Updated: February 10, 2017 11:30 IST

देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये प्रवर्तक तसेच संचालक मंडळातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 10 - टाटा समूहातील वादानंतर आता देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये प्रवर्तक तसेच संचालक मंडळातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. इन्फोसिस कंपनीमधील खालावलेल्या कारभारावर कंपनीचे सहसंस्थापक एन.आर.नारायण मूर्ती यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी असेही म्हटले की 'काही लोकांना कंपनी सोडताना मनमानी पद्धतीने जास्त पैसे (सेव्हरेंज पॅकेज) देण्यात येत आहे, यामुळे अन्य कर्मचा-यांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होत आहे'. 
 
यावेळी, कंपनीतील माजी अधिकारी डेविड कॅनडी आणि राजीव बन्सल यांना देण्यात आलेल्या सेव्हरेंज पॅकेजवर त्यांनी प्रश्नदेखील उपस्थित केले. एखादी कंपनी कोणत्याही कर्मचा-याचे करारपत्र नियोजित कार्याकाळापूर्वीच संपवते, त्यावेळी संबंधित कर्मचा-याला सेव्हरेंज पॅकेज दिले जाते. इन्फोसिसच्या नियमानुसार कर्मचा-यांना 3 महिन्याचे सेव्हरेंज पॅकेज दिले जाते. मात्र कॅनडी यांना 12 महिने आणि राजीव बन्सल यांना 30 महिन्यांचे सेव्हरेंज पॅकेज दिले गेले. ही पद्धत अयोग्य असल्याचे सांगत नारायणमूर्ती यांनी यामुळे अन्य कर्मचा-यांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली. 
 
मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालक विशाल सिक्का यांच्यापासून काहीही समस्या नाही, मात्र कंपनीचे संचालक मंडळ ज्यापद्धतीने काम करत,त्यावर दुःखी असल्याची प्रतिक्रिया नारायणमूर्ती दिली आहे. काही कर्मचा-यांना मोठ्या रक्कमेतील सेव्हरेंज पॅकेज मिळत असल्याने अन्य कर्मचा-यांनी यावर असंतोष व्यक्त केला आहे.  कर्मचा-यांचे जवळपास 1,800 हून अधिक ई-मेल प्राप्त झाले असून यात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 
 
ई-मेलद्वारे कर्मचा-यांनी नाराजी व्यक्त करत,'आम्हाला केवळ 80 टक्के चल वेतन (Variable Pay) मिळते, मात्र कंपनी सोडणा-या अधिका-यांना दोन वर्षांपर्यंतचे 100 टक्के चल वेतन देण्यात आले, हे योग्य आहे का?, अस प्रश्न उपस्थित केला गेला आहे. नारायणमूर्ती यांनी सांगितले की, इन्फोसिसला या प्रकरणात अन्य कर्मचा-यांचे समाधान करणं गरजेचं आहे कारण यामुळे त्यांचे मनोधैर्य खचत आहे. 'आम्ही मूल्ये आणि संस्कृतीवर आधारित असलेल्या या संस्थेला बनवण्यासाठी आपले आयुष्य घालवले, त्यामुळे येथील आताची परिस्थिती पाहून दुःख होते', अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.