शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
3
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
4
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
5
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
6
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
7
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
8
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
9
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
10
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
11
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!
12
Radhika Yadav : "भावाला बाहेर पाठवलं, पिटबुलला बांधलं अन् राधिकाला मारलं"; हिमांशिकाचा धक्कादायक खुलासा
13
पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
“प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला, कडक कारवाई करावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
16
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
17
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
18
शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंगची थिअरी आणि समर्थ रामदास यांच्या स्तोत्रात आहे एक साम्य!
19
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
20
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था

इन्फोसिसमधल्या कारभाराबाबत नारायण मूर्ती दुःखी

By admin | Updated: February 10, 2017 11:30 IST

देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये प्रवर्तक तसेच संचालक मंडळातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 10 - टाटा समूहातील वादानंतर आता देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये प्रवर्तक तसेच संचालक मंडळातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. इन्फोसिस कंपनीमधील खालावलेल्या कारभारावर कंपनीचे सहसंस्थापक एन.आर.नारायण मूर्ती यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी असेही म्हटले की 'काही लोकांना कंपनी सोडताना मनमानी पद्धतीने जास्त पैसे (सेव्हरेंज पॅकेज) देण्यात येत आहे, यामुळे अन्य कर्मचा-यांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होत आहे'. 
 
यावेळी, कंपनीतील माजी अधिकारी डेविड कॅनडी आणि राजीव बन्सल यांना देण्यात आलेल्या सेव्हरेंज पॅकेजवर त्यांनी प्रश्नदेखील उपस्थित केले. एखादी कंपनी कोणत्याही कर्मचा-याचे करारपत्र नियोजित कार्याकाळापूर्वीच संपवते, त्यावेळी संबंधित कर्मचा-याला सेव्हरेंज पॅकेज दिले जाते. इन्फोसिसच्या नियमानुसार कर्मचा-यांना 3 महिन्याचे सेव्हरेंज पॅकेज दिले जाते. मात्र कॅनडी यांना 12 महिने आणि राजीव बन्सल यांना 30 महिन्यांचे सेव्हरेंज पॅकेज दिले गेले. ही पद्धत अयोग्य असल्याचे सांगत नारायणमूर्ती यांनी यामुळे अन्य कर्मचा-यांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली. 
 
मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालक विशाल सिक्का यांच्यापासून काहीही समस्या नाही, मात्र कंपनीचे संचालक मंडळ ज्यापद्धतीने काम करत,त्यावर दुःखी असल्याची प्रतिक्रिया नारायणमूर्ती दिली आहे. काही कर्मचा-यांना मोठ्या रक्कमेतील सेव्हरेंज पॅकेज मिळत असल्याने अन्य कर्मचा-यांनी यावर असंतोष व्यक्त केला आहे.  कर्मचा-यांचे जवळपास 1,800 हून अधिक ई-मेल प्राप्त झाले असून यात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 
 
ई-मेलद्वारे कर्मचा-यांनी नाराजी व्यक्त करत,'आम्हाला केवळ 80 टक्के चल वेतन (Variable Pay) मिळते, मात्र कंपनी सोडणा-या अधिका-यांना दोन वर्षांपर्यंतचे 100 टक्के चल वेतन देण्यात आले, हे योग्य आहे का?, अस प्रश्न उपस्थित केला गेला आहे. नारायणमूर्ती यांनी सांगितले की, इन्फोसिसला या प्रकरणात अन्य कर्मचा-यांचे समाधान करणं गरजेचं आहे कारण यामुळे त्यांचे मनोधैर्य खचत आहे. 'आम्ही मूल्ये आणि संस्कृतीवर आधारित असलेल्या या संस्थेला बनवण्यासाठी आपले आयुष्य घालवले, त्यामुळे येथील आताची परिस्थिती पाहून दुःख होते', अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.