शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

नांद न्यूज

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

चोरविहिरा जलाशयाचा फायदा काय?

चोरविहिरा जलाशयाचा फायदा काय?
शेतकऱ्यांचा सवाल : वन विभागाच्या आडकाठीमुळे शेतीपर्यंत पाणी पोहोचले नाही
नांद / भगवानपूर : उमरेड वन परिक्षेत्राच्या दक्षिण भागात ४० वर्षांपूर्वी चोरविहिरा क्र. २ जलाशय तयार करण्यात आले. मात्र वन विभागाने आडकाठी आणल्याने त्या जलाशयातून शेतीपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. परिणामी या जलाशयाचा फायदा काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या ४० वर्षांपूर्वी चोरविहिरा जलाशय बांधण्यात आले. या जलाशयाची सिंचन क्षमता १५०० हेक्टरची आहे. जलाशय पूर्णत्वास आल्यानंतर मुख्य कालव्याचे खोदकामाला सुरुवात करण्यात आली. वन विभागाच्या हद्दीतून १००० मीटर लांब अंतरापर्यंत हा कालवा जातो. यापैकी ८०० मीटरचे खोदकाम करण्यात आले. उर्वरित २०० मीटरचे काम शिल्लक असताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोदकाम करण्यास मज्जाव केला. तेव्हापासून ते काम बंद असून २०० मीटरसाठी शेतीला पाणी पोहोचू शकले नाही.
वन विभागाने आडकाठी आणल्यामुळे किमान शेतातील कालव्याचे काम पूर्ण करण्याच्या कामी कंत्राटदार लागला. त्याने शेतातून जाणाऱ्या कालव्याचे काम केले. मात्र २०० मीटरचे खोदकाम होऊन तो कालवा जोडला जात नाही, तोपर्यंत त्या कालव्याचा काहीएक फायदा होऊ शकत नाही. गेल्या ४० वर्षांपूर्वी हे काम करण्यात आले. तेव्हापासून ते बंदस्थितीत असल्याने सध्या ते कालवेसुद्धा जमीनदोस्त झाल्याचे दिसून येते. बऱ्याच ठिकाणी कालवा नेमका कुठे होता, हे कळायला मार्ग नाही.
या जलाशयाच्या काही अंतरावर चोरविहिरा क्र. १ हे जलाशय आहे. त्या जलाशयाची निर्मितीसुद्धा त्याच कालावधीत झाली. त्या जलाशयाचा कालवासुद्धा वन विभागाच्या जागेतून जातो. मात्र त्यास वन विभागाने विरोध केला नाही. त्याचा शेतीसाठी लाभ होत असला तरी त्याची सिंचन क्षमता केवळ ५०० हेक्टर आहे. दुसरीकडे मोठ्या जलाशयाच्या मार्गात आडकाठी आणल्याने १५०० हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. या जलाशयाकडे सिंचन विभागाने लक्ष देऊन त्वरित काम पूर्ण करावे, जलाशयाचा फायदा शेतीला होईल यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)