शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
3
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
4
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
5
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
6
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
7
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासरखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
8
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
9
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
10
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
11
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
12
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
13
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
14
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
15
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
16
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
17
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
18
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
19
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
20
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती

माल्यासारख्यांची नावे केंद्राने सार्वजनिक करावीत - सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: January 4, 2017 08:34 IST

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चार आठवड्यांमध्ये 500 कोटीहून जास्त व्यवसायिक कर्ज घेऊन ते न फेडणा-यांची माहिती देण्याचा आदेश दिला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - करोडो रुपयांचं व्यवसायिक कर्ज घेणा-यांची नावं लवकरच सार्वजिनिक होऊ शकतात. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चार आठवड्यांमध्ये 500 कोटीहून जास्त व्यवसायिक कर्ज घेऊन ते न फेडणा-यांची माहिती देण्याचा आदेश दिला आहे. 
 
मुख्य न्यायाधीश टीएस ठाकूर, एएम खानविलकर आणि चंद्रचूण यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) याप्रकरणी दाखवलेल्या असहमतीकडे दुर्लक्ष करत कर्जबुडव्यांची नावे सार्वजनिक करण्यास सांगितलं आहे. 
 
(विजय मल्ल्यांचे कर्ज माफ केले, आता माझेही करा !)
 
ऑक्टोबरमध्ये खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान मोठं कर्ज घेऊन न फेडणा-यांची नावे का सार्वजनिक केली जाऊ नयेत ? असा सवाल आरबीआयला विचारण्यात आला होता. अशा कर्जबुडव्यांविरोधात ज्येष्ठ वकिल प्रशांत भूषण यांनी एका स्वयंसेवी संस्थेमार्फत जनहित याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी आरबीयला म्हटलं होतं की, अशा कर्जदारांची नावे सार्वजनिक केल्याने जो काही प्रभाव पडेल तो कर्ज घेणा-यांवर पडेल. पण असं करण्यावर आरबीआयचा आक्षेप का आहे ? असा सवालही विचारला होता. 
 
आपण दिलेल्या आदेशाचा केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या कर्ज पुनर्प्राप्ती समितीशी काहीच संबंध नसल्याचंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. न्यायालयाने यावेळी कर्ज पुनर्प्राप्ती न्यायाधिकरणाच्या पायाभूत सुविधांची दखल घेत याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश केंद्राला दिला आहे, ज्यामध्ये पायाभूत सुविधांच्या  सुधारणांसाठी घेण्यात येणा-या अॅक्शन प्लानची माहिती असावी.