शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कर्जबुडव्यांची नावे आणणार चव्हाट्यावर

By admin | Updated: May 9, 2016 04:28 IST

ऐपत असूनही मुद्दाम कर्ज बुडविणाऱ्यांची (विलफुल डिफॉल्टर) यादी तयार करून त्यांची नावे सार्वजनिक करण्याची तयारी सुरू आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : ऐपत असूनही मुद्दाम कर्ज बुडविणाऱ्यांची (विलफुल डिफॉल्टर) यादी तयार करून त्यांची नावे सार्वजनिक करण्याची तयारी सुरू आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर कर्जांच्या प्रकरणी न्यायालयाबाहेर समझोता करण्याचे प्रयत्नही चालू असल्याचे त्यांनी सांगितले.शनिवारी येथे एका कार्यक्रमात बोलताना राजन म्हणाले की, कर्ज घेऊन ते चुकते न करणाऱ्या सर्वांचीच नावे जाहीर केली जाणार नाहीत. मोठ्या कर्जबुडव्यांसोबत त्यांची नावे जाहीर करणे योग्य ठरणार नाही. विशेषत: जे लोक क्रेडिट कार्डाचे बिल देण्याचे विसरून गेले आहेत त्यांची नावे जाहीर करणे बरोबर ठरणार नाही, असे झाल्यास लोक क्रेडिट कार्डाचा वापर करणेच सोडून देतील.राजन म्हणाले की, रिझर्व्ह बँक ही नियामक संस्था असली तरी चुकीचे काम करणाऱ्यांना वाचविण्याचा आमचा हेतू नाही. उलट अशा लोकांची नावे जाहीर केल्याने आम्ही खुश होऊ. खरे तर या दिशेने आम्ही काम करीत आहोत त्यांची नावे सर्वांपर्यंत सहज पोहोचवावीत, अशी आमची इच्छा आहे. अनेक लोकांविरुद्ध पूर्वीपासूनच खटले सुरू आहेत. ती नावे लोकांना माहीतच आहेत. त्यांचाही या यादीत समावेश असेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)> प्रकरण सर्वोच्च न्यायालयातसध्या पंजाब नॅशनल बँक मुद्दाम कर्ज बुडविणाऱ्यांची नावे वेळोवेळी जाहीर करीत आहे. दुसऱ्या बँकांनी आतापर्यंत ही प्रणाली अवलंबिलेली नाही. राजन यांचे हे वक्तव्य येण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेने बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात अशा मोठ्या कर्जबुडव्यांची यादी जाहीर केली होती आणि न्यायालयाने ती नावे जाहीर करू नये, अशी विनंती बँकेला केली होती. सर्वोच्च न्यायालयात मात्र ही नावे जाहीर करण्याच्या बाजूने आहे.अनेक प्रकल्प सुरू न झाल्याने भारतीय बँकांच्या थकीत कर्जाचे प्रमाण वाढत चालले आहे. मंदीमुळे अनेक कंपन्यांच्या व्यवसायात घट झाली आहे. त्यांच्याविरुद्ध कर्जाचे ओझे वाढत चालले आहे.