शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

नायडूंच्या तटस्थतेची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:41 IST

राज्यसभेत सत्ताधारी पक्ष तसा अल्पमतात आहे. विरोधकांमधे बहुमत आहे. दोन्ही पक्षांचे संतुलन सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी नवे उपराष्ट्रपती व सभापती व्यंकय्या नायडूंना पार पाडावी लागणार आहे.

सुरेश भटेवरा/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्यसभेत सत्ताधारी पक्ष तसा अल्पमतात आहे. विरोधकांमधे बहुमत आहे. दोन्ही पक्षांचे संतुलन सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी नवे उपराष्ट्रपती व सभापती व्यंकय्या नायडूंना पार पाडावी लागणार आहे. हे करताना त्यांची एकप्रकारे कसोटीच असणार आहे.शुक्रवार (११ आॅगस्ट) हा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या कारकिर्दीचा १0 आॅगस्ट हा अखेरचा दिवस असल्याने शुक्रवारपासून नवे उपराष्ट्रपती नायडूंच्या राज्यसभेतील सभापती पदाच्या कारकिर्दीचा प्रारंभ होईल. राज्यसभेत भाजप प्रथमच सर्वात मोठया पक्षाच्या भूमिकेत आहे. मोदी सरकारच्या उर्वरित दिड वर्षाच्या कारकिर्दीत या सभागृहात अधिकाधिक विधेयके मंजूर व्हायला हवीत, अशी सरकारची अपेक्षा आहे. तुल्यबळ संख्येतल्या सत्ताधारी व विरोधकांमधे संतुलन सांभाळीत ही अवघड जबाबदारी मुख्यत्वे नायडूंनाच पार पाडायची आहे.उपराष्ट्रपती पदासह राज्यसभेचे सभापतीपद हमीद अन्सारींनी सलग दहा कौशल्याने सांभाळले. अनेक ताणतणावाचे प्रसंग राज्यसभेने या काळात अनुभवले मात्र कठीण प्रसंगातही सभागृहाचे संतुलन अन्सारींनी अत्यंत संयमाने हाताळले. काही लक्षवेधी प्रसंगात अन्सारींचे क्वचित काही निर्णय वादग्रस्तही ठरले. उदाहरणेच द्यायची तर ३0 डिसेंबर २0११ रोजी रात्री १२ वाजता सभागृहात लोकपाल विधेयकावर चर्चा सुरू असतांना अन्सारींनी राज्यसभेचे कामकाज अचानक तहकूब केले. सत्ताधारी काँग्रेसला सांभाळण्यासाठीच हा निर्णय त्यांनी घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर राजपथावरील आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पहिल्या कार्यक्रमात हमीद अन्सारी उपस्थित नसल्याने भाजपच्या प्रवक्त्यांनी त्यांच्यावर टीका केली मात्र सरकारतर्फे या कार्यक्रमाचे उपराष्ट्रपतींना निमंत्रणच पाठवण्यात आले नव्हते हे सत्य उघडकीला आल्यावर अन्सारींची माफी मागायची पाळी या प्रवक्त्यांवर आली.कौशल्य पणाला लावावे लागणारभारताच्या १३ व्या उपराष्ट्रपतिपदी निवड होण्याआधी व्यंकय्या नायडू मोदी सरकारमधे नगरविकास व माहिती प्रसारण खात्याचे मंत्री होते. सुरूवातीची दोन वर्षे संसदीय कामकाज मंत्र्याची जबाबदारीही त्यांनी सांभाळली मात्र आक्रमक आवेशात विरोधकांच्या प्रत्येक आरोपाचे खंडन करण्याच्या उत्साहात काही प्रसंगात नायडूंनी वादही ओढवून घेतले.राज्यसभेचे सभापतीपद अत्यंत तटस्थतेने सांभाळावे लागते. विशेषत: सभागृहात सत्ताधारी पक्ष अल्पमतात असतांना वाद न होऊ देता सारे कौशल्य पणाला लावून या पदाची प्रतिष्ठा व जबाबदारी नायडूंना सांभाळावी लागेल.