शहरं
Join us  
Trending Stories
1
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
2
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
3
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
4
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
5
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
6
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
7
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
8
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
9
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
10
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
11
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
12
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
13
प्रवाशांसाठी गुड न्यूज! कोकण रेल्वेवरील ‘या’ एक्स्प्रेसचा वेग वाढला; ४० मिनिटे लवकर पोहोचेल
14
Kandivali: कांदिवलीत भरदिवसा तिघांचा दुचाकीने येत इस्टेट एजंटवर गोळीबार!
15
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
16
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
17
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
18
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
19
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
20
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
Daily Top 2Weekly Top 5

नायडूंच्या तटस्थतेची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:41 IST

राज्यसभेत सत्ताधारी पक्ष तसा अल्पमतात आहे. विरोधकांमधे बहुमत आहे. दोन्ही पक्षांचे संतुलन सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी नवे उपराष्ट्रपती व सभापती व्यंकय्या नायडूंना पार पाडावी लागणार आहे.

सुरेश भटेवरा/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्यसभेत सत्ताधारी पक्ष तसा अल्पमतात आहे. विरोधकांमधे बहुमत आहे. दोन्ही पक्षांचे संतुलन सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी नवे उपराष्ट्रपती व सभापती व्यंकय्या नायडूंना पार पाडावी लागणार आहे. हे करताना त्यांची एकप्रकारे कसोटीच असणार आहे.शुक्रवार (११ आॅगस्ट) हा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या कारकिर्दीचा १0 आॅगस्ट हा अखेरचा दिवस असल्याने शुक्रवारपासून नवे उपराष्ट्रपती नायडूंच्या राज्यसभेतील सभापती पदाच्या कारकिर्दीचा प्रारंभ होईल. राज्यसभेत भाजप प्रथमच सर्वात मोठया पक्षाच्या भूमिकेत आहे. मोदी सरकारच्या उर्वरित दिड वर्षाच्या कारकिर्दीत या सभागृहात अधिकाधिक विधेयके मंजूर व्हायला हवीत, अशी सरकारची अपेक्षा आहे. तुल्यबळ संख्येतल्या सत्ताधारी व विरोधकांमधे संतुलन सांभाळीत ही अवघड जबाबदारी मुख्यत्वे नायडूंनाच पार पाडायची आहे.उपराष्ट्रपती पदासह राज्यसभेचे सभापतीपद हमीद अन्सारींनी सलग दहा कौशल्याने सांभाळले. अनेक ताणतणावाचे प्रसंग राज्यसभेने या काळात अनुभवले मात्र कठीण प्रसंगातही सभागृहाचे संतुलन अन्सारींनी अत्यंत संयमाने हाताळले. काही लक्षवेधी प्रसंगात अन्सारींचे क्वचित काही निर्णय वादग्रस्तही ठरले. उदाहरणेच द्यायची तर ३0 डिसेंबर २0११ रोजी रात्री १२ वाजता सभागृहात लोकपाल विधेयकावर चर्चा सुरू असतांना अन्सारींनी राज्यसभेचे कामकाज अचानक तहकूब केले. सत्ताधारी काँग्रेसला सांभाळण्यासाठीच हा निर्णय त्यांनी घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर राजपथावरील आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पहिल्या कार्यक्रमात हमीद अन्सारी उपस्थित नसल्याने भाजपच्या प्रवक्त्यांनी त्यांच्यावर टीका केली मात्र सरकारतर्फे या कार्यक्रमाचे उपराष्ट्रपतींना निमंत्रणच पाठवण्यात आले नव्हते हे सत्य उघडकीला आल्यावर अन्सारींची माफी मागायची पाळी या प्रवक्त्यांवर आली.कौशल्य पणाला लावावे लागणारभारताच्या १३ व्या उपराष्ट्रपतिपदी निवड होण्याआधी व्यंकय्या नायडू मोदी सरकारमधे नगरविकास व माहिती प्रसारण खात्याचे मंत्री होते. सुरूवातीची दोन वर्षे संसदीय कामकाज मंत्र्याची जबाबदारीही त्यांनी सांभाळली मात्र आक्रमक आवेशात विरोधकांच्या प्रत्येक आरोपाचे खंडन करण्याच्या उत्साहात काही प्रसंगात नायडूंनी वादही ओढवून घेतले.राज्यसभेचे सभापतीपद अत्यंत तटस्थतेने सांभाळावे लागते. विशेषत: सभागृहात सत्ताधारी पक्ष अल्पमतात असतांना वाद न होऊ देता सारे कौशल्य पणाला लावून या पदाची प्रतिष्ठा व जबाबदारी नायडूंना सांभाळावी लागेल.