शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नायडूंना अपेक्षेहून जास्त मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:01 IST

शनिवारी झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी ‘रालोआ’चे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू यांना मिळालेली ५१६ मते ही गेल्या ३३ वर्षांत या पदावर विजयी झालेल्या कोणत्याही

नवी दिल्ली : शनिवारी झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी ‘रालोआ’चे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू यांना मिळालेली ५१६ मते ही गेल्या ३३ वर्षांत या पदावर विजयी झालेल्या कोणत्याही उमेदवाराहून सर्वाधिक मते आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ‘राओला’चे रामनाथ कोविंद यांना मिळालेल्या खासदारांच्या ५२२ मतांच्या तुलनेत नायडू यांना सहा मते कमी मिळाली असली तरी विरोधी पक्षांची मते फुटल्याने नायडू यांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली, असा दावा भाजपाच्या सूत्रांनी केला.नायडू यांचे निवडणूक एजंट व या निवडणुकीसाठी प्रमुख म्हणून नेमलेले भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव म्हणाले की, काटेकोर नियोजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृढ निर्धार यामुळे पक्षाच्या सर्व खासदारांची मते वैध ठरली व ती नायडू यांच्या बाजूने दिली गेली.ज्या १४ खासदारांनी मतदान केले नाही त्यापैकी १२ विरोधी पक्षांचे होते. भाजपाचे दोन खासदार इस्पितळात असल्याने मतदानास येऊ शकले नाहीत.नायडू यांना अपेक्षेपेक्षा १७ मते जास्त मिळाल्याचा हिशेब सांगताना पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की,राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘रालोआ’च्या उमेदवारास ५२२ खासदारांची मते मिळाली होती. मात्र त्यापैकी बिजू जनता दल व जदयू या दोन पक्षांनी उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षाच्या बाजूने मतदान करण्याचे ठरविल्याने नायडू यांची अपेक्षित मते ४० ने कमी होऊन ४८२ वर आली होती.राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘रालोआ’च्या १७ खासदारांची मते अवैध ठरली होती. यावेळी चौघांची मते अवैध ठरली. त्यामुळे हे मते गृहित धरली तर नायडू यांची एकूण अपेक्षित मते ४९५ एवढी होती. १० नामनिर्देशित खासदारांनी बहुतांश नायडूंना मते दिली असे गृहित धरले तरी नायडूंना मिळालेली त्याहून अधिकची मते विरोधी पक्षाच्या खासदारांकडून मिळाली हे उघड आहे, असे पक्षाचे म्हणणे आहे.इशारा देऊनही चूक केलीभाजपाच्या एकाही खासदाराचे मत बाद ठरून वाया जाता कामा नये, असा सक्त इशारा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दिला होता. एवढेच नव्हे तर मत देताना कोणत्या चुका होतात हे समजावे व त्या टाळल्या जाव्या यासाठी पक्षाने प्रतिरूप मतदानही आयोजित केले होते. तरीही शनिवारच्या मतदानात रालोआची चार अपेक्षित मते बाद ठरली. काँग्रेसचे दोन खासदार मतदानास आले नाहीत व त्याची कारणेही पक्षाने दिली नाहीत. या दोघांवर काय कारवाई करायची ते नंतर पाहू, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आजाद म्हणाले.