शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नायडूंना अपेक्षेहून जास्त मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:01 IST

शनिवारी झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी ‘रालोआ’चे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू यांना मिळालेली ५१६ मते ही गेल्या ३३ वर्षांत या पदावर विजयी झालेल्या कोणत्याही

नवी दिल्ली : शनिवारी झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी ‘रालोआ’चे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू यांना मिळालेली ५१६ मते ही गेल्या ३३ वर्षांत या पदावर विजयी झालेल्या कोणत्याही उमेदवाराहून सर्वाधिक मते आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ‘राओला’चे रामनाथ कोविंद यांना मिळालेल्या खासदारांच्या ५२२ मतांच्या तुलनेत नायडू यांना सहा मते कमी मिळाली असली तरी विरोधी पक्षांची मते फुटल्याने नायडू यांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली, असा दावा भाजपाच्या सूत्रांनी केला.नायडू यांचे निवडणूक एजंट व या निवडणुकीसाठी प्रमुख म्हणून नेमलेले भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव म्हणाले की, काटेकोर नियोजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृढ निर्धार यामुळे पक्षाच्या सर्व खासदारांची मते वैध ठरली व ती नायडू यांच्या बाजूने दिली गेली.ज्या १४ खासदारांनी मतदान केले नाही त्यापैकी १२ विरोधी पक्षांचे होते. भाजपाचे दोन खासदार इस्पितळात असल्याने मतदानास येऊ शकले नाहीत.नायडू यांना अपेक्षेपेक्षा १७ मते जास्त मिळाल्याचा हिशेब सांगताना पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की,राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘रालोआ’च्या उमेदवारास ५२२ खासदारांची मते मिळाली होती. मात्र त्यापैकी बिजू जनता दल व जदयू या दोन पक्षांनी उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षाच्या बाजूने मतदान करण्याचे ठरविल्याने नायडू यांची अपेक्षित मते ४० ने कमी होऊन ४८२ वर आली होती.राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘रालोआ’च्या १७ खासदारांची मते अवैध ठरली होती. यावेळी चौघांची मते अवैध ठरली. त्यामुळे हे मते गृहित धरली तर नायडू यांची एकूण अपेक्षित मते ४९५ एवढी होती. १० नामनिर्देशित खासदारांनी बहुतांश नायडूंना मते दिली असे गृहित धरले तरी नायडूंना मिळालेली त्याहून अधिकची मते विरोधी पक्षाच्या खासदारांकडून मिळाली हे उघड आहे, असे पक्षाचे म्हणणे आहे.इशारा देऊनही चूक केलीभाजपाच्या एकाही खासदाराचे मत बाद ठरून वाया जाता कामा नये, असा सक्त इशारा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दिला होता. एवढेच नव्हे तर मत देताना कोणत्या चुका होतात हे समजावे व त्या टाळल्या जाव्या यासाठी पक्षाने प्रतिरूप मतदानही आयोजित केले होते. तरीही शनिवारच्या मतदानात रालोआची चार अपेक्षित मते बाद ठरली. काँग्रेसचे दोन खासदार मतदानास आले नाहीत व त्याची कारणेही पक्षाने दिली नाहीत. या दोघांवर काय कारवाई करायची ते नंतर पाहू, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आजाद म्हणाले.