शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नायडूंना अपेक्षेहून जास्त मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:01 IST

शनिवारी झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी ‘रालोआ’चे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू यांना मिळालेली ५१६ मते ही गेल्या ३३ वर्षांत या पदावर विजयी झालेल्या कोणत्याही

नवी दिल्ली : शनिवारी झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी ‘रालोआ’चे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू यांना मिळालेली ५१६ मते ही गेल्या ३३ वर्षांत या पदावर विजयी झालेल्या कोणत्याही उमेदवाराहून सर्वाधिक मते आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ‘राओला’चे रामनाथ कोविंद यांना मिळालेल्या खासदारांच्या ५२२ मतांच्या तुलनेत नायडू यांना सहा मते कमी मिळाली असली तरी विरोधी पक्षांची मते फुटल्याने नायडू यांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली, असा दावा भाजपाच्या सूत्रांनी केला.नायडू यांचे निवडणूक एजंट व या निवडणुकीसाठी प्रमुख म्हणून नेमलेले भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव म्हणाले की, काटेकोर नियोजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृढ निर्धार यामुळे पक्षाच्या सर्व खासदारांची मते वैध ठरली व ती नायडू यांच्या बाजूने दिली गेली.ज्या १४ खासदारांनी मतदान केले नाही त्यापैकी १२ विरोधी पक्षांचे होते. भाजपाचे दोन खासदार इस्पितळात असल्याने मतदानास येऊ शकले नाहीत.नायडू यांना अपेक्षेपेक्षा १७ मते जास्त मिळाल्याचा हिशेब सांगताना पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की,राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘रालोआ’च्या उमेदवारास ५२२ खासदारांची मते मिळाली होती. मात्र त्यापैकी बिजू जनता दल व जदयू या दोन पक्षांनी उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षाच्या बाजूने मतदान करण्याचे ठरविल्याने नायडू यांची अपेक्षित मते ४० ने कमी होऊन ४८२ वर आली होती.राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘रालोआ’च्या १७ खासदारांची मते अवैध ठरली होती. यावेळी चौघांची मते अवैध ठरली. त्यामुळे हे मते गृहित धरली तर नायडू यांची एकूण अपेक्षित मते ४९५ एवढी होती. १० नामनिर्देशित खासदारांनी बहुतांश नायडूंना मते दिली असे गृहित धरले तरी नायडूंना मिळालेली त्याहून अधिकची मते विरोधी पक्षाच्या खासदारांकडून मिळाली हे उघड आहे, असे पक्षाचे म्हणणे आहे.इशारा देऊनही चूक केलीभाजपाच्या एकाही खासदाराचे मत बाद ठरून वाया जाता कामा नये, असा सक्त इशारा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दिला होता. एवढेच नव्हे तर मत देताना कोणत्या चुका होतात हे समजावे व त्या टाळल्या जाव्या यासाठी पक्षाने प्रतिरूप मतदानही आयोजित केले होते. तरीही शनिवारच्या मतदानात रालोआची चार अपेक्षित मते बाद ठरली. काँग्रेसचे दोन खासदार मतदानास आले नाहीत व त्याची कारणेही पक्षाने दिली नाहीत. या दोघांवर काय कारवाई करायची ते नंतर पाहू, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आजाद म्हणाले.