शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

व्यंकय्या नायडूंवर पक्षपाताचा आरोप; राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 03:18 IST

नवी दिल्ली : सभापती व्यंकय्या नायडू  मनमानी अन् पक्षपाती धोरणानुसार विरोधकांचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न करीत आहेत. संसदेत व बाहेर लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. विरोधी सदस्यांना शक्यतो बोलूच द्यायचे नाही, असा सभापतींचा पवित्रा आहे. असे आरोप करीत काँग्रेस, समाजवादी, तृणमूल, ‘आप’सह बहुतांश विरोधी पक्षांनी मंगळवारी राज्यसभेतून  सभात्याग केला. त्यामुळे कामकाज दिवसभर तहकूब झाले.

ठळक मुद्देकामकाज तहकूब

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सभापती व्यंकय्या नायडू  मनमानी अन् पक्षपाती धोरणानुसार विरोधकांचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न करीत आहेत. संसदेत व बाहेर लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. विरोधी सदस्यांना शक्यतो बोलूच द्यायचे नाही, असा सभापतींचा पवित्रा आहे. असे आरोप करीत काँग्रेस, समाजवादी, तृणमूल, ‘आप’सह बहुतांश विरोधी पक्षांनी मंगळवारी राज्यसभेतून  सभात्याग केला. त्यामुळे कामकाज दिवसभर तहकूब झाले.विरोधी खासदार बाहेर पडताच पत्रकारांना भेटले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यावेळी म्हणाले की, विविध राज्यांतील जनहिताचे मुद्दे मांडणे हे विरोधी खासदारांचे कामच आहे. काही मुद्दे इतके संवेदनशील असतात की त्याकडे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा नोटीस देण्यापुरता वेळही नसतो. विषयाचे गांभीर्य लक्षात घेउन त्यावर  खासदारांना बोलू दिले जात होते. व्यंकय्या नायडू ही परंपरा पाळायला तयार नसून, विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यावेळी म्हणाले की, सभापतींचा हाच पवित्रा कायम राहिला तर की पुढे काय करायचे, याचा निर्णय विरोधकांना घ्यावा लागेल. तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन म्हणाले, सभागृहाच्या आत आणि बाहेर लोकशाहीचा गळा घोटण्याचाच हा प्रकार आहे आम्ही सारे विरोधक त्यामुळेच एकत्र आलो आहोत. आपचे संजयसिंग म्हणाले की, आज सभागृह सुरळीत सुरू होते. कोणीही सदस्य गोंधळ व गदारोळ करीत नव्हता. बोलण्यासाठी काही सदस्य जागांवर उभे राहून सभापतींची परवानगी मागत होते. त्यांना बोलण्याची संधी देऊ न सभापती शांतही करू शकले असते. मात्र त्यांनी ५ मिनिटात २ वाजेपर्यंत त्यांनी कामकाज तहकूब करून टाकले. 

लोकसभेत सत्ताधार्‍यांचा गोंधळराष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलायला काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे उभे राहिले, तेव्हा भाजप व रालोआच्या आंध्रच्या सदारांनी दुसर्‍याच विषयावर गदारोळ माजवून खरगेंना बोलू दिले नाही. सत्ताधारी व विरोधकांची तडजोड झाल्यावर मात्र दुपारी खरगेंचे भाषण झाले.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू