शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

मानसिकता बदलेल तेव्हाच समाज सुधारेल नागराज मंजुळे : भारत व पाकच्या पंतप्रधानांनी सीमेवर रात्र काढावी

By admin | Updated: March 15, 2016 00:34 IST

जळगाव- आपण बहिणाबाई चौधरी, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत फक्त लिहितो... वाचतो... संधी मिळाली तर आवेशात किंवा देश बदलून टाकू अशा आविर्भावात कविता म्हणतो... पण या थोरांचे विचार प्रत्यक्षात येत नाहीत. कारण मानसिकता बदललेली नाही. आपली मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत जातपात नष्ट होणार नाही, समाज सुधारणार नाही, असे मत कवी,दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

जळगाव- आपण बहिणाबाई चौधरी, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत फक्त लिहितो... वाचतो... संधी मिळाली तर आवेशात किंवा देश बदलून टाकू अशा आविर्भावात कविता म्हणतो... पण या थोरांचे विचार प्रत्यक्षात येत नाहीत. कारण मानसिकता बदललेली नाही. आपली मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत जातपात नष्ट होणार नाही, समाज सुधारणार नाही, असे मत कवी,दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
उमवितील विचारधारा प्रशाळेंतर्गत कार्यरत असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन वसंशोधनकेंद्राच्यावतीनेसोमवारी सकाळी अधिसभा सभागृहात मंजुळे यांचा मी, कविता आणि चित्रपट या विषयावर व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम, कुलसचिव अशोक महाजन, प्रा.अनिल डोंगरे, डॉ.आशुतोष पाटील उपस्थित होते.
दोन्ही पंतप्रधानांनी सीमेवर रात्र काढावी
सियाचीनमध्ये सैनिकांना वीरमरण आले. भारत व पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तेथे जाऊन एक रात्र कर्तव्य करावे... मग सीमा प्रश्न कसा सुटत नाही, ते पहा, असेही नागराज मंजुळे उपहासाने म्हणाले.
मंदिरात जातो, पण बांधकाम पाहायला
मी मंदिरात देवदर्शनासाठी जाणे कधीच सोडून दिले. मंदिरांमध्ये गेले तर तेथील बांधकाम पाहतो. माझ्या पूर्वजांनी मोठे कष्ट घेऊन मंदिरे बांधली. त्यांनी असे सुंदर बांधकाम कसे केले असेल, असे प्रश्न मला पडतात. मंदिरांना लावलेल्या दगडांना हात लावून मला आनंद मिळतो. पण आपण जुन्या मंदिरांना रंग मारून आपली भलावण करून घेण्यात मोठेपण मानतो... हा विचार बदलायला हवा, असेही मंजुळे म्हणाले.
जसे बाबासाहेब मंदिरात गेले, तसे शनिदेवाचे दर्शन घ्या
अलीकडे शनिदेवाच्या दर्शनाचा मुद्दा उपस्थित केला जातो. महिलांनी शनिदेवाचे दर्शन घ्यायला हवे. कुठलीही भीती ठेवू नका, जसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंदिरात दर्शनासाठी गेले, तसे जाऊन दर्शन घ्या, असेही नागराजमंजुळे म्हणाले.
देशद्रोह, शनिचौथर्‍यापेक्षा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा
मुलांनी देशद्रोह केला...., शनिचौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतले असे प्रश्न सध्याचर्चेत आहे. पण अजूनही काही गरिबांची मुले क्षयरोगाने मृत्यू पावत आहेत. आपल्या मुलाबाळांना क्षय रोग आहे हे अजूनही अनेक गरिबांना माहीत होत नाही... ते त्यांना उपचारासाठी नेऊ शकत नाहीत. अनेक कुटुंबांना वन्य प्राणी खाऊन जगावे लागते. ही स्थिती अजूनही आहे. हे प्रश्न महत्त्वाचे नाहीत का, असा प्रश्नही नागराज मंजुळे यांनी केला.