शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

मानसिकता बदलेल तेव्हाच समाज सुधारेल नागराज मंजुळे : भारत व पाकच्या पंतप्रधानांनी सीमेवर रात्र काढावी

By admin | Updated: March 15, 2016 00:34 IST

जळगाव- आपण बहिणाबाई चौधरी, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत फक्त लिहितो... वाचतो... संधी मिळाली तर आवेशात किंवा देश बदलून टाकू अशा आविर्भावात कविता म्हणतो... पण या थोरांचे विचार प्रत्यक्षात येत नाहीत. कारण मानसिकता बदललेली नाही. आपली मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत जातपात नष्ट होणार नाही, समाज सुधारणार नाही, असे मत कवी,दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

जळगाव- आपण बहिणाबाई चौधरी, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत फक्त लिहितो... वाचतो... संधी मिळाली तर आवेशात किंवा देश बदलून टाकू अशा आविर्भावात कविता म्हणतो... पण या थोरांचे विचार प्रत्यक्षात येत नाहीत. कारण मानसिकता बदललेली नाही. आपली मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत जातपात नष्ट होणार नाही, समाज सुधारणार नाही, असे मत कवी,दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
उमवितील विचारधारा प्रशाळेंतर्गत कार्यरत असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन वसंशोधनकेंद्राच्यावतीनेसोमवारी सकाळी अधिसभा सभागृहात मंजुळे यांचा मी, कविता आणि चित्रपट या विषयावर व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम, कुलसचिव अशोक महाजन, प्रा.अनिल डोंगरे, डॉ.आशुतोष पाटील उपस्थित होते.
दोन्ही पंतप्रधानांनी सीमेवर रात्र काढावी
सियाचीनमध्ये सैनिकांना वीरमरण आले. भारत व पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तेथे जाऊन एक रात्र कर्तव्य करावे... मग सीमा प्रश्न कसा सुटत नाही, ते पहा, असेही नागराज मंजुळे उपहासाने म्हणाले.
मंदिरात जातो, पण बांधकाम पाहायला
मी मंदिरात देवदर्शनासाठी जाणे कधीच सोडून दिले. मंदिरांमध्ये गेले तर तेथील बांधकाम पाहतो. माझ्या पूर्वजांनी मोठे कष्ट घेऊन मंदिरे बांधली. त्यांनी असे सुंदर बांधकाम कसे केले असेल, असे प्रश्न मला पडतात. मंदिरांना लावलेल्या दगडांना हात लावून मला आनंद मिळतो. पण आपण जुन्या मंदिरांना रंग मारून आपली भलावण करून घेण्यात मोठेपण मानतो... हा विचार बदलायला हवा, असेही मंजुळे म्हणाले.
जसे बाबासाहेब मंदिरात गेले, तसे शनिदेवाचे दर्शन घ्या
अलीकडे शनिदेवाच्या दर्शनाचा मुद्दा उपस्थित केला जातो. महिलांनी शनिदेवाचे दर्शन घ्यायला हवे. कुठलीही भीती ठेवू नका, जसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंदिरात दर्शनासाठी गेले, तसे जाऊन दर्शन घ्या, असेही नागराजमंजुळे म्हणाले.
देशद्रोह, शनिचौथर्‍यापेक्षा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा
मुलांनी देशद्रोह केला...., शनिचौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतले असे प्रश्न सध्याचर्चेत आहे. पण अजूनही काही गरिबांची मुले क्षयरोगाने मृत्यू पावत आहेत. आपल्या मुलाबाळांना क्षय रोग आहे हे अजूनही अनेक गरिबांना माहीत होत नाही... ते त्यांना उपचारासाठी नेऊ शकत नाहीत. अनेक कुटुंबांना वन्य प्राणी खाऊन जगावे लागते. ही स्थिती अजूनही आहे. हे प्रश्न महत्त्वाचे नाहीत का, असा प्रश्नही नागराज मंजुळे यांनी केला.