शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मानसिकता बदलेल तेव्हाच समाज सुधारेल नागराज मंजुळे : भारत व पाकच्या पंतप्रधानांनी सीमेवर रात्र काढावी

By admin | Updated: March 15, 2016 00:34 IST

जळगाव- आपण बहिणाबाई चौधरी, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत फक्त लिहितो... वाचतो... संधी मिळाली तर आवेशात किंवा देश बदलून टाकू अशा आविर्भावात कविता म्हणतो... पण या थोरांचे विचार प्रत्यक्षात येत नाहीत. कारण मानसिकता बदललेली नाही. आपली मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत जातपात नष्ट होणार नाही, समाज सुधारणार नाही, असे मत कवी,दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

जळगाव- आपण बहिणाबाई चौधरी, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत फक्त लिहितो... वाचतो... संधी मिळाली तर आवेशात किंवा देश बदलून टाकू अशा आविर्भावात कविता म्हणतो... पण या थोरांचे विचार प्रत्यक्षात येत नाहीत. कारण मानसिकता बदललेली नाही. आपली मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत जातपात नष्ट होणार नाही, समाज सुधारणार नाही, असे मत कवी,दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
उमवितील विचारधारा प्रशाळेंतर्गत कार्यरत असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन वसंशोधनकेंद्राच्यावतीनेसोमवारी सकाळी अधिसभा सभागृहात मंजुळे यांचा मी, कविता आणि चित्रपट या विषयावर व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम, कुलसचिव अशोक महाजन, प्रा.अनिल डोंगरे, डॉ.आशुतोष पाटील उपस्थित होते.
दोन्ही पंतप्रधानांनी सीमेवर रात्र काढावी
सियाचीनमध्ये सैनिकांना वीरमरण आले. भारत व पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तेथे जाऊन एक रात्र कर्तव्य करावे... मग सीमा प्रश्न कसा सुटत नाही, ते पहा, असेही नागराज मंजुळे उपहासाने म्हणाले.
मंदिरात जातो, पण बांधकाम पाहायला
मी मंदिरात देवदर्शनासाठी जाणे कधीच सोडून दिले. मंदिरांमध्ये गेले तर तेथील बांधकाम पाहतो. माझ्या पूर्वजांनी मोठे कष्ट घेऊन मंदिरे बांधली. त्यांनी असे सुंदर बांधकाम कसे केले असेल, असे प्रश्न मला पडतात. मंदिरांना लावलेल्या दगडांना हात लावून मला आनंद मिळतो. पण आपण जुन्या मंदिरांना रंग मारून आपली भलावण करून घेण्यात मोठेपण मानतो... हा विचार बदलायला हवा, असेही मंजुळे म्हणाले.
जसे बाबासाहेब मंदिरात गेले, तसे शनिदेवाचे दर्शन घ्या
अलीकडे शनिदेवाच्या दर्शनाचा मुद्दा उपस्थित केला जातो. महिलांनी शनिदेवाचे दर्शन घ्यायला हवे. कुठलीही भीती ठेवू नका, जसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंदिरात दर्शनासाठी गेले, तसे जाऊन दर्शन घ्या, असेही नागराजमंजुळे म्हणाले.
देशद्रोह, शनिचौथर्‍यापेक्षा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा
मुलांनी देशद्रोह केला...., शनिचौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतले असे प्रश्न सध्याचर्चेत आहे. पण अजूनही काही गरिबांची मुले क्षयरोगाने मृत्यू पावत आहेत. आपल्या मुलाबाळांना क्षय रोग आहे हे अजूनही अनेक गरिबांना माहीत होत नाही... ते त्यांना उपचारासाठी नेऊ शकत नाहीत. अनेक कुटुंबांना वन्य प्राणी खाऊन जगावे लागते. ही स्थिती अजूनही आहे. हे प्रश्न महत्त्वाचे नाहीत का, असा प्रश्नही नागराज मंजुळे यांनी केला.