शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं उलगडलं गूढ

By admin | Updated: May 31, 2017 18:30 IST

"तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा" असा नारा देत भारतीय स्वतंत्र लढ्याला नवचैतन्य देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ अखेर उलघडले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 31 - "तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा" असा नारा देत भारतीय स्वतंत्र लढ्याला नवचैतन्य देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ अखेर उलघडले आहे. 1945 रोजी झालेल्या तैवानमधील विमान अपघातात जखमी झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमच भारतीय सरकारने स्पष्ट केले आहे. सायक सेन या व्यक्तीने याबाबत एक आरटीआय अंतर्गत याबाबतची माहिती मागितली होती. आरटीआयमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना गृह मंत्रालयाकडून असे स्पष्ट करण्यात आले की, शहनवाज कमेटी, जस्टिस जीडी खोसला कमिशन आणि जस्टिस मुखर्जी कमिशन यांच्या रिपोर्टनुसार नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात झाला होता. मुखर्जी कमिशन यांच्या रिपोर्टमध्ये पान क्रमांक 112 ते 122 याबाबत माहिती आहे. तसेच नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 37 गोपनीय फायली सरकारने याआधीच सार्वजनिक केल्या आहेत. 

गृह मंत्रालयाच्या या स्पष्टीकरणावर सुभाष चंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेताजीचे पंतू आणि पश्चिम बंगालचे भाजपा नेते चंद्र कुमार बोस यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गृह मंत्रालयाने याबाबत माफी मागावी असे म्हटले आहे. विमान अपघातात जखमी झाल्याने नेताजींचा मृत्यू झाल्याचे ब्रिटनमधील बोसफाईल्स डॉट इन्फो या संकेतस्थळावर 17 जानेवारी 2016 रोजी स्पष्ट केले होते. यामध्ये त्यांनी असे म्हटले की, नेताजींचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात तैपेई येथे झाला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बरोबर त्यावेळी असलेल्या पाच जणांची साक्ष उपलब्ध असून त्यात नेताजींचा निकटचा सहकारी. जपानचे दोन डॉक्टर, एक दुभाष्या व तैवानी परिचारिका यांचा समावेश आहे.