शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

म्यानमार नव्हे मणिपूरमध्येच सैन्याने केली कारवाई

By admin | Updated: September 16, 2015 12:03 IST

भारतीय सैन्याने जूनमध्ये म्यानमारमध्ये जाऊन दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी केला असला तरी प्रत्यक्षात ही मोहीम म्यानमारमध्ये झालीच नाही असे समजते.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १६ - भारतीय सैन्याने जूनमध्ये म्यानमारमध्ये जाऊन दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी केला असला तरी प्रत्यक्षात सैन्याचे हे ऑपरेशन म्यानमारऐवजी भारताच्या हद्दीतच झाले होते अशी माहिती समोर येत आहे. या मोहीमेतील जवानांना दिलेल्या वीरता पुरस्कारामध्ये म्यानमारमध्ये जाऊन मोहीम राबवल्याचा उल्लेख टाळण्यात आल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. 

भारतीय सैन्याने जूनमध्ये मणिपूर व नागालँडमधील दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरु केली होती. हे दहशतवादी सीमारेषा ओलांडून म्यानमारच्या हद्दीत तळ ठोकून राहायचे. जूनमध्ये भारतीय सैन्याने थेट म्यानमारच्या हद्दीत जाऊन या दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले व दहशतवाद्यांना ठार मारले असा दावा राज्यवर्धन राठोड यांनी केला होता. 

सैन्याने या ऑपरेशनशी संबंधीत अधिकारी व जवान अशा आठ जणांना वीरता पुरस्कार दिला आहे. पुरस्कारात या मोहीमेचा उल्लेख आहे पण मोहीम म्यानमारमध्ये राबवल्याचा उल्लेख कुठेच नाही. त्यामुळे ही मोहीम बहुधा भारत - म्यानमार सीमेजवळ भारताच्या हद्दीतच राबवली गेली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.  यापूर्वी जवानांना दिल्या जाणा-या वीरता पुरस्काराच्या प्रशस्ती पत्रकातील मजकूर सार्वजनिक केला जायचा. यंदा मात्र याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. सैन्याच्या प्रवक्त्यांनीही यावर उत्तर देणे टाळले आहे. 'जूनमध्ये आम्ही प्रसिद्धीपत्रक काढून ऑपरेशनची माहिती दिली होती. मणिपूर - नागालँड सीमेजवळ ही मोहीम पार पडली होती' असे सैन्याच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. मात्र ही मोहीम म्यानमारमध्ये जाऊन राबवण्यात आली असे थेट उत्तर त्यांनी दिले नाही.