शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

म्यानमार नव्हे मणिपूरमध्येच सैन्याने केली कारवाई

By admin | Updated: September 16, 2015 12:03 IST

भारतीय सैन्याने जूनमध्ये म्यानमारमध्ये जाऊन दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी केला असला तरी प्रत्यक्षात ही मोहीम म्यानमारमध्ये झालीच नाही असे समजते.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १६ - भारतीय सैन्याने जूनमध्ये म्यानमारमध्ये जाऊन दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी केला असला तरी प्रत्यक्षात सैन्याचे हे ऑपरेशन म्यानमारऐवजी भारताच्या हद्दीतच झाले होते अशी माहिती समोर येत आहे. या मोहीमेतील जवानांना दिलेल्या वीरता पुरस्कारामध्ये म्यानमारमध्ये जाऊन मोहीम राबवल्याचा उल्लेख टाळण्यात आल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. 

भारतीय सैन्याने जूनमध्ये मणिपूर व नागालँडमधील दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरु केली होती. हे दहशतवादी सीमारेषा ओलांडून म्यानमारच्या हद्दीत तळ ठोकून राहायचे. जूनमध्ये भारतीय सैन्याने थेट म्यानमारच्या हद्दीत जाऊन या दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले व दहशतवाद्यांना ठार मारले असा दावा राज्यवर्धन राठोड यांनी केला होता. 

सैन्याने या ऑपरेशनशी संबंधीत अधिकारी व जवान अशा आठ जणांना वीरता पुरस्कार दिला आहे. पुरस्कारात या मोहीमेचा उल्लेख आहे पण मोहीम म्यानमारमध्ये राबवल्याचा उल्लेख कुठेच नाही. त्यामुळे ही मोहीम बहुधा भारत - म्यानमार सीमेजवळ भारताच्या हद्दीतच राबवली गेली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.  यापूर्वी जवानांना दिल्या जाणा-या वीरता पुरस्काराच्या प्रशस्ती पत्रकातील मजकूर सार्वजनिक केला जायचा. यंदा मात्र याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. सैन्याच्या प्रवक्त्यांनीही यावर उत्तर देणे टाळले आहे. 'जूनमध्ये आम्ही प्रसिद्धीपत्रक काढून ऑपरेशनची माहिती दिली होती. मणिपूर - नागालँड सीमेजवळ ही मोहीम पार पडली होती' असे सैन्याच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. मात्र ही मोहीम म्यानमारमध्ये जाऊन राबवण्यात आली असे थेट उत्तर त्यांनी दिले नाही.