शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lokmat Parliamentary Awards: सर्जिकल स्ट्राइकविषयी माझा प्रश्न सैन्याबद्दल नव्हताच : दिग्विजय सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2023 10:30 IST

न्यूज-१८ चे व्यवस्थापकीय संपादक किशोर अजवानी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

सर्जिकल स्ट्राइकवेळी मी उपस्थित केलेले प्रश्न सैन्याबद्दल नव्हते तर भाजपच्या नेत्यांनी केलेल्या वेगवेगळ्या तथ्यहीन वक्तव्यांवर होते. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे नेमके किती सैनिक मारले, हा तो प्रश्न होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी हात वर केले तरी काँग्रेसने कधी मला नोटीस दिली नव्हती, असे स्पष्टीकरण मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी दिले आहे. पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. मध्य प्रदेशची आगामी निवडणूक कमलनाथ यांच्याच नेतृत्वात लढवली जाईल, असे दिग्विजय सिंह यांनी ‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’मध्ये बोलताना सांगितले. 

न्यूज-१८ चे व्यवस्थापकीय संपादक किशोर अजवानी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. दिग्विजय सिंह म्हणाले की, आपण नेहमीच पक्षाच्या आदेशाचे पालन केले आहे. कधीही पक्षविरोधी राहिलो नाही व कोणत्याही वक्तव्यावर मला कधीही पक्षाने नोटीस दिलेली नाही. कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी कर्तव्य म्हणून फॉर्म मागे घेतला होता. मध्य प्रदेशात माझ्या नावाने विविध तथ्यहीन दावे करण्यात येतात. आपण मुख्यमंत्री राहिलो असलो तरी पुढील निवडणूक कमलनाथ यांच्याच नेतृत्वात लढू. 

नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात लोकशाहीची अक्षरश: हत्या सुरू आहे. राहुल गांधींचे संसदेतील भाषण रेकॉर्डवरून उडविले गेले. ते विदेशात लोकशाहीच्या मर्यादेत राहूनच बोलले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप करताना दिग्विजय सिंह पुढे म्हणाले की, संघ ही नोंदणीकृत संस्था नाही. एकीकडे भारतीय राज्यघटनेबद्दल बोलतात तर दुसरीकडे हिंदू राष्ट्राची भाषा करतात. नेपाळमध्ये ९५ टक्के लोक हिंदू असूनही ते राष्ट्र हिंदू नाही. इस्लामिक पाकिस्तानची दुर्दशा सर्व जग पाहत आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश असल्याने येथे हिंदू राष्ट्राची संकल्पना शक्य नाही आणि तसा विचार देशहिताचा नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड