शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘मेरे कान पक गये है’!

By admin | Updated: January 28, 2016 02:05 IST

जकात आणि अबकारी शुल्क विभागाशी संबंधित लोकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वित्त मंत्रालयाशी संलग्न

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली

जकात आणि अबकारी शुल्क विभागाशी संबंधित लोकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वित्त मंत्रालयाशी संलग्न असलेल्या या दोन्ही विभागांबाबतच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी उच्चस्तरीय निगराणी यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले असल्याची माहिती आहे.पंतप्रधान मोदी हे बुधवारी दिवसभर आर्थिक कामकाजावरील मंत्रिमंडळ समिती आणि मंत्रिमंडळ व विविध योजनांशी संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात व्यस्त होते. सरकारचे कुठे आणि काय चुकते आहे, हे जाणून घेणे आणि सरकारची प्रतिमा उजळण्यासाठी काय करता येईल, यावर विचारमंथन करणे हा या मंत्रिस्तरीय संवादाचा उद्देश होता.मोदी यांनी आपल्या कार्यालयात मोठ्या संख्येने प्राप्त होत असलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत, ही समस्या निर्माण होण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. ‘मेरे कान पक गये है,’ असे पंतप्रधान मोदी वित्त मंत्रालयाच्या तीन सचिवांसह अन्य मंत्रालयांच्या वरिष्ठ सचिवांना उद्देशून म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली. कडक निगराणी यंत्रणेच्या माध्यमातून या तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश मोदींनी या विभागांच्या सचिवांना दिले.दादरी येथील अखलाक हत्याकांड, हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाची आत्महत्येसह अन्य काही घटना आणि सरकार तसेच भाजपातील वाचाळवीरांमुळे तसेही मोदी फार चिंतित आहेत. त्यांनी बुधवारी आपल्या मंत्र्यांसोबत घेतलेल्या अनौपचारिक बैठकीत अतिशय जोशपूर्ण असे भाषण केले. परंतु ‘प्रगती’ (प्रो-अ‍ॅक्टिव्ह गव्हर्नन्स अ‍ॅण्ड टाईमली इम्प्लिमेंटेशन) च्या ९ व्या बैठकीत बोलताना मात्र त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जबर धक्का दिला. ‘माझ्याकडे लोकांकडून अनेक तक्रारी मिळत आहेत आणि हे मी सहन करणार नाही,’ असे मोदी म्हणाले.अनेक योजनांची समीक्षाअधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत मोदींनी रस्ते, रेल्वे, कोळसा, ऊर्जा आणि अक्षय न नवीनीकरण ऊर्जा क्षेत्रासह इतरही अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीची समीक्षा केली. ज्या प्रकल्पांच्या प्रगतीची मोदींनी समीक्षा केली, त्यात मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर आणि अलाहाबाद ते हल्दिया दरम्यानच्या जलमार्ग विकास प्रकल्पाचा समावेश आहे. त्यासोबतच मोदींनी उज्ज्वल डिस्कॉम अ‍ॅश्युरंस योजनेची (उदय) प्रगती आणि नॅशनल ओल्ड एज पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीचीही समीक्षा केली.