शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

युती तोडली म्हणून माझ्या ७०० पिढ्या काढल्या

By admin | Updated: November 1, 2015 00:26 IST

जळगाव- युती तुटली नसती तर भाजपाचा मुख्यमंत्री झाला नसता. युती तोडल्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतल्यानंतर तो निरोप पोहोचविण्याची जबाबदारी माझ्यावर दिली. युती तोडल्याचा निरोप फक्त मी शिवसेनेला दिला. म्हणून शिवसेनेला नाथाभाऊ दिसतो. पण शिवसेने गद्दारी केली. जळगाव जिल्ह्याने ती अनुभवली. यामुळे आपला पुत्र निखील खडसे पराभूत झाला. आमच्या मोठ्या भावाचे (शिवसेनेचे) मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगले म्हणून माझ्या ७०० पिढ्या काढल्या, अशी आगपाखड महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी भाजपातर्फे सरकारच्या वर्षपूर्तर्ीनिमित्त आयोजित जाहीर सभेत केली.

जळगाव- युती तुटली नसती तर भाजपाचा मुख्यमंत्री झाला नसता. युती तोडल्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतल्यानंतर तो निरोप पोहोचविण्याची जबाबदारी माझ्यावर दिली. युती तोडल्याचा निरोप फक्त मी शिवसेनेला दिला. म्हणून शिवसेनेला नाथाभाऊ दिसतो. पण शिवसेने गद्दारी केली. जळगाव जिल्ह्याने ती अनुभवली. यामुळे आपला पुत्र निखील खडसे पराभूत झाला. आमच्या मोठ्या भावाचे (शिवसेनेचे) मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगले म्हणून माझ्या ७०० पिढ्या काढल्या, अशी आगपाखड महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी भाजपातर्फे सरकारच्या वर्षपूर्तर्ीनिमित्त आयोजित जाहीर सभेत केली.
शहरात सुभाष चौकात रात्री ही सभा झाली. व्यासपीठावर खासदार ए.टी.पाटील, रक्षा खडसे, जि.प.अध्यक्ष प्रयाग कोळी, प्रवक्ते माधव भंडारी, आमदार हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, उन्मेष पाटील, सुरेश भोळे, जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन, विधान परिषद आमदार स्मिता वाघ, गुरूमुख जगवानी, जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे, गजानन जोशी, राजेंद्र फडके आदी उपस्थित होते.
भाजपाचे एकट्याच्या बळावर सरकार
युती तुटली म्हणून राज्यात इतिहासात प्रथमच भाजपाचे सरकार आले. शपथविधीनंतर शिवसेना सोबत आली. पण युतीत जे मोठा भाऊ म्हणून आम्हाला हिणवत होते ते लहान भाऊ झाले. युती तुटली नसती तर मोठ्या भावाकडेच मुख्यमंत्रीपद राहीले असते, असेही खडसे म्हणाले.

आपच्या प्रीती आल्या, त्यांनी माझे नाव घेतले
इकडे आपच्या प्रीती आल्या होत्या. त्यांनी माझे नाव घेतले. आपले नाव मोठे करण्यासाठी कुणीही माझे नाव कुठेही जोडते, अशी टिका खडसेंनी केली.

वृत्तपत्र माझे नाव छापून टीआरपी वाढवताहेत
अनेक वृत्तपत्रांना नाथाभाऊ दिसतो. आपला टीआरपी वाढविण्यासाठी ते माझ्यावर लेख छापतात. नाथाभाऊच्या नावाशिवाय वृत्तपत्रांचा टिआरपी वाढत नाही. त्यांना मी आवडतो. अधून मधून आठ-१५ दिवस ते माझे नाव घेत राहतात. पण कुणी कितीही उलटे, सुलटे लेख छापले, तरी मी निवडून येईलच, असेही खडसे म्हणाले.

उपस्थितांमधून कापसावर बोलण्याची मागणी
खडसे आपले भाषण करीत असताना उपस्थितांमध्ये असलेल्या एका व्यक्तीने कापसाचे काय, असे जोरात ओरडत विचारले. त्यानंतर खडसे कापसाच्या मुद्द्यावर आले. सध्या कापसाला ४५०० भाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिती सुधारत आहे. आम्ही कापसाच्या बियाण्याचे दर कमी केले. पेट्रोलचा दर लीटरमागे २० रुपयांनी कमी केला. रेल्वे भाडेवाढ केली नाही, शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्नकेला,असेहीखडसेम्हणाले.