शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मुस्लिमांनो, डौलाने तिरंगा फडकवा !

By admin | Updated: August 15, 2015 02:23 IST

धक्कादायक फतवे काढून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या दारुल उलुम देवबंदने स्वातंत्र्यदिनी शनिवारी मुस्लीम बांधवांनी आपल्या घरांवर तिरंगा फडकवावा असा फतवा काढला असून, स्वातंत्र्य दिन

फैजाबाद : धक्कादायक फतवे काढून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या दारुल उलुम देवबंदने स्वातंत्र्यदिनी शनिवारी मुस्लीम बांधवांनी आपल्या घरांवर तिरंगा फडकवावा असा फतवा काढला असून, स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्याचे आवाहनही केले आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात दारुल उलुमच्या उलेमांनी (मुस्लीम धार्मिक नेते) महत्त्वाची भूमिका वठविली होती. सर्वप्रथम दारुल उलुमनेच संपूर्ण स्वातंत्र्याचे आवाहन केले होते. त्यानंतर पूर्ण स्वराज्याची चळवळ सुरू झाली होती, याचे स्मरण देवबंदचे प्रवक्ते अशरफ उस्मानी यांनी यानिमित्त करून दिले. मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता हुसेन अहमद मदानी यांच्यापासून तर मौलवी अहमदुल्ला शाह यांच्यापर्यंत अनेक स्वातंत्र्य सेनानींनी जीवाची बाजी लावली. याकडे लक्ष वेधताना ते म्हणाले, की देवबंदने सर्व मुस्लीम बांधवांना घरांवर तसेच व्यावसायिक संस्थांवर तिरंगा फडकाविण्याचे आवाहन केले आहे. (वृत्तसंस्था)देशभक्तीचे धडेकाही धर्मांध शक्तींद्वारे मुस्लीम समुदायाला नेहमीच लक्ष्य केले जाते. आमच्या देशभक्तीवर संशय घेतला जातो. परंतु आम्ही आमच्या मदरशांमध्ये परस्परांप्रती प्रेम आणि देशभक्तीचे धडे देतो. यापूर्वीही आम्ही स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरे केले असून, देशभक्तीची ही परंपरा पुढेही सुरूच राहील, अशी भावना अयोध्येत मदरसा चालविणारे हाफीज अखलक अहमद लतिफ यांनी व्यक्त केली.