शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

तर मुस्लिम देशात आझम खान यांचा झाला असता शिरच्छेद - स्वामी

By admin | Updated: June 29, 2017 18:36 IST

लष्करावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणारे समाजवादी पक्षाचे मुस्लिम नेते आझम खान यांच्यावर सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज जोरदार

ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 29 -  लष्करावर आक्षेपार्ह भाषेत टीका  करणारे समाजवादी पक्षाचे मुस्लिम नेते आझम खान यांच्यावर सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. आझम खान यांनी जर मुस्लिम राष्ट्रामध्ये असे वक्तव्य केले असते तर त्यांचा शिरच्छेद झाला असता, असा टोला स्वामी यांनी लगावला. लष्करातील जवान बलात्कारी असल्याने महिला दहशतवादी लष्कर जवानांचे गुप्तांग कापून सोबत घेऊन गेले. हात किंवा शीर  न कापता शरीरातील ज्या भागासंबंधी त्यांची तक्रार होती, तोच भाग कापून ते घेऊन गेले. त्यांनी एक मोठा संदेश दिला असून, संपूर्ण देशाला याची लाज वाटली पाहिजे, असे आझम खान म्हणाले होते. 
आझम खानांच्या वक्तव्याच्या समाचार घेताना स्वामी म्हणाले, "आझम खानसारख्या लोकांना चर्चेत राहायचे असते. असे लोक मुस्लिम समाजालाही फसवत असतात. आझम खान नेहमीच अशी वाह्यात वक्तवे करत असतात. त्यांना भारतात ज्या प्रकारच्या लोकशाहीची मजा घेता येते तशी कुठल्या मुस्लिम देशात घेता आली नसती. त्यांनी कुठल्याही मुस्लिम देशात असे वक्तव्य केले असते तर त्यांचा शिरच्छेद केला गेला असता, किंवा त्यांना दगडांनी ठेचून ठार मारण्यात आले असते."  
समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांनीही आझम खान यांच्यावर टीका केली आहे. आझम खान यांचे वक्तव्य दुर्दैवी आणि बाष्कळपणाचे आहे, त्यांची ती सवयच आहे. याआधीही त्यांनी भारतमातेचा उल्लेख डायन असा केला होता. त्यांनी पालनपोषण केलेली माणसे पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना पकडली गेली आहेत. माहीत नाही अशा माणसाला देश का सहन करत आहे, असे अमर सिंह म्हणाले.