शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ट्रिपल तलाक संपवण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढे यावं, मोदींचं आवाहन

By admin | Updated: April 29, 2017 13:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रिपल तलाकच्या मुद्याचं राजकारण न करण्याचा आग्रह करत मुस्लिम समाजाला पुढे येऊन तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रिपल तलाकच्या मुद्याचं राजकारण न करण्याचा आग्रह करत मुस्लिम समाजाला पुढे येऊन तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी बाराव्या शतकातील क्रांतीकारी समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं. मोदी बोलले की, "समाजातील लोकच जुन्या परंपरा तोडून आधुनिक गोष्टींचा स्विकार करतात. मला आशा आहे की मुस्लिम समाजातील लोक पुढे येतील आणि ट्रिपल तलाकशी संघर्ष करत असलेल्या मुस्लिम महिलांना मदत करत मार्ग काढतील". 
 
नरेंद्र मोदी यांनी यावेळी हिंदू धर्मातील सतीप्रथेला संपवणा-या समाजसुधारक राजा राममोहन राय यांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की, "राजा राममोहन राय यांनी जेव्हा सतीप्रथेवर बंदी आणण्यासंबंधी आपले विचार मांडले असतील तेव्हा त्यांच्यावर किती टिका झाली असेल. पण तरीही त्यांनी आपल्याच समाजातील प्रथेविरोधात लढा दिला आणि करुन दाखवलं.
 
मोदींनी मुस्लिम समाजाला ट्रिपल तलाकवर तोडगा काढण्याचं आवाहन करताना सांगितलं की, "ट्रिपल तलाकवरुन सध्या देशात एवढी चर्चा सुरु आहे. आपली महान पंरपरा पाहता मलाही आशा वाटू लागली आहे. आपल्या देशात समाजामधीलच लोक समोर येतात ते अयोग्य, चुकीच्या प्रथांना विरोध करत त्यांचा विमोड करुन आधुनिक परंपरांचा स्विकार करतात".
 
फार पुर्वीच महिलांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार देण्यात आला आहे. ट्रिपल तलाकच्या मुद्याचं राजकारण होता कामा नये. भारतातूनच शिक्षित मुसलमान पुढे येतील आणि या मुद्यावर तोडगा काढतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. मोदींनी सांगितलं की, "समस्येवरील उपाय शोधून काढणं गरजेचं आहे. ट्रिपल तलाकला सामोरं जावं लागत असलेल्या महिलांची सुटका केली गेली पाहिजे. देशातील शिक्षित मुस्लिमांनी यासाठी पाऊलं उचलावीत. याचा फायदा येणा-या पिढ्यांना होईल".