शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

मुस्लीम बोर्डाचे प्रतिज्ञापत्र ही निव्वळ धूळफेक - रोहटगी

By admin | Updated: May 24, 2017 02:34 IST

‘ट्रिपल तलाक’च्या प्रश्नावर ‘आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ने समाजासाठी आणि काझींसाठी तयार केलेली मार्गदर्शिका आणि त्याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘ट्रिपल तलाक’च्या प्रश्नावर ‘आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ने समाजासाठी आणि काझींसाठी तयार केलेली मार्गदर्शिका आणि त्याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सादर केलेले प्रतिज्ञापत्र ही निव्वळ धुळफेक आणि समाजात थोडीफार वैधता मिळविण्यासाठी केलेली शेवटची धडपड आहे, अशी टीका अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनी मंगळवारी केली.ही प्रथा अनिष्ट असल्याचे कबुल करूनही न्यायालयात त्याचे समर्थन करणाऱ्या बोर्डाला मुळात अशा प्रकारचे सल्ले जारी करण्याचा अधिकारच काय, असा प्रश्न उपस्थित करून रोहटगी म्हणाले की, सर्वांचा युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवला गेल्यानंतर बोर्डाने असे करणे हा न्यायालयाचे लक्ष भलतीकडे वळविण्याचा प्रकार आहे. ही प्रथा चांगली नाही, असे वाटते तर बोर्डाने स्वत:हून ती रद्द करण्यास न्यायालयास सांगायला हवे होते, असेही त्यांनी नमूद केले.रोहटगी असेही म्हणाले की, माझ्या मते बोर्डाचे ताजे प्रतिज्ञापत्र ही धूळफेक आहे. बोर्डाला स्वत:ला काही वैधता नाही. ते मुस्लीम समाजातील किती लोकांच्या वतीने हे म्हणणे मांडत आहेत, हेही कळायला मार्ग नाही. त्यांनी सांगितलेले लोकांनी ऐकावे, असा त्यांच्याकडे कोणताही अधिकार नाही. बोर्डाने केलेल्या सल्लावजा सूचना किती काझींना समजतील, किती त्यांच्याशी राजी होतील व किती त्या प्रत्यक्षात पाळतील, हाही एक प्रश्नच आहे. पुढे ते म्हणाले, बोर्डाने सल्ला दिला म्हणून ‘निकाह’च्या वेळी किती काझी नवरदेवाला ‘ट्रिपल तलाक’ न देण्याबाबत सांगून तशी अट निकाहनाम्यात घालतील हेही स्पष्ट नाही.