शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

दलितांना शस्त्रे नाकारल्याने मुस्लिम आक्रमण यशस्वी

By admin | Updated: April 14, 2016 00:58 IST

मुस्लिमांनी एकेकाळी केलेली आक्रमणे यशस्वी होण्यामागचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले कारण योग्य असल्याचे सांगत रा. स्व. संघाने त्यांच्या

नवी दिल्ली : मुस्लिमांनी एकेकाळी केलेली आक्रमणे यशस्वी होण्यामागचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले कारण योग्य असल्याचे सांगत रा. स्व. संघाने त्यांच्या विचारांशी जवळीक दाखविण्याचे प्रयत्न सुरूच ठेवल्याचे ‘आॅर्गनायझर’ या मुखपत्रातील ताज्या लेखावरून स्पष्ट होते.भारतीय समाजातील बहुतांश घटकांना शस्त्रे बाळगता येत नव्हती. दलितांना नि:शस्त्र ठेवले जात होते. त्यांना रणांगणात लढण्याची परवानगी दिली जात नव्हती, त्यामुळेच त्या काळी विदेशींनी किंवा मुुस्लिमांनी भारतावर केलेली आक्रमणे यशस्वी झाली, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत योग्य असल्याचा दावा साप्ताहिक ‘आॅर्गनायझर’ने नुकत्याच प्रकाशित अंकात केला आहे. अस्पृश्यांना शस्त्रांपासून वंचित ठेवण्यात आले नसते तर या देशावर विदेशी लोकांनी राज्य केले नसते, असे आंबेडकरांचे विधान या लेखात नमूद केले आहे. संपूर्ण देशभरात डॉ. आंबेडकरांची १२५ वी जयंती साजरी केली जात आहे.मुखपृष्ठात सामाजिक योगदानाची दखल...आॅर्गनायझरच्या मुखपृष्ठ लेखात (कव्हर स्टोरी) डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक योगदानाची विस्तृत माहिती दिलेली आहे. ते वंचित आणि कमकुवत घटकांसाठी कसे लढले, याचा तपशीलही त्यात आहे. भारताची लोकशाही आणि राष्ट्रवादाला सामाजिक-आर्थिक आधारावर नवे परिमाण मिळवून देण्यात आंबेडकरांचे योगदान एकमेवाद्वितीय होते. समाजातील तळागाळाच्या घटकांना आत्मसन्मान मिळाल्याखेरीज देश उभा ठाकणार नाही, हे डॉ. आंबेडकरांचे विचार होते, असेही त्यात म्हटले आहे. दलितप्रेमाचे कारण काय?हिंदूंना एकजूट करण्याच्या व्यापक योजनेंतर्गत दलितांना आपल्याकडे ओढत त्यांचे ख्रिश्चनांमध्ये होणारे धर्मांतर टाळण्यासह मुस्लिम संघटनांनी अनुसूचित जातींसोबत आघाडी स्थापन करू नये या हेतूने संघाने दलितांकडे लक्ष केंद्रित केले असावे, असे विश्लेषकांना वाटते.