शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दलितांना शस्त्रे नाकारल्याने मुस्लिम आक्रमण यशस्वी

By admin | Updated: April 14, 2016 00:58 IST

मुस्लिमांनी एकेकाळी केलेली आक्रमणे यशस्वी होण्यामागचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले कारण योग्य असल्याचे सांगत रा. स्व. संघाने त्यांच्या

नवी दिल्ली : मुस्लिमांनी एकेकाळी केलेली आक्रमणे यशस्वी होण्यामागचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले कारण योग्य असल्याचे सांगत रा. स्व. संघाने त्यांच्या विचारांशी जवळीक दाखविण्याचे प्रयत्न सुरूच ठेवल्याचे ‘आॅर्गनायझर’ या मुखपत्रातील ताज्या लेखावरून स्पष्ट होते.भारतीय समाजातील बहुतांश घटकांना शस्त्रे बाळगता येत नव्हती. दलितांना नि:शस्त्र ठेवले जात होते. त्यांना रणांगणात लढण्याची परवानगी दिली जात नव्हती, त्यामुळेच त्या काळी विदेशींनी किंवा मुुस्लिमांनी भारतावर केलेली आक्रमणे यशस्वी झाली, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत योग्य असल्याचा दावा साप्ताहिक ‘आॅर्गनायझर’ने नुकत्याच प्रकाशित अंकात केला आहे. अस्पृश्यांना शस्त्रांपासून वंचित ठेवण्यात आले नसते तर या देशावर विदेशी लोकांनी राज्य केले नसते, असे आंबेडकरांचे विधान या लेखात नमूद केले आहे. संपूर्ण देशभरात डॉ. आंबेडकरांची १२५ वी जयंती साजरी केली जात आहे.मुखपृष्ठात सामाजिक योगदानाची दखल...आॅर्गनायझरच्या मुखपृष्ठ लेखात (कव्हर स्टोरी) डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक योगदानाची विस्तृत माहिती दिलेली आहे. ते वंचित आणि कमकुवत घटकांसाठी कसे लढले, याचा तपशीलही त्यात आहे. भारताची लोकशाही आणि राष्ट्रवादाला सामाजिक-आर्थिक आधारावर नवे परिमाण मिळवून देण्यात आंबेडकरांचे योगदान एकमेवाद्वितीय होते. समाजातील तळागाळाच्या घटकांना आत्मसन्मान मिळाल्याखेरीज देश उभा ठाकणार नाही, हे डॉ. आंबेडकरांचे विचार होते, असेही त्यात म्हटले आहे. दलितप्रेमाचे कारण काय?हिंदूंना एकजूट करण्याच्या व्यापक योजनेंतर्गत दलितांना आपल्याकडे ओढत त्यांचे ख्रिश्चनांमध्ये होणारे धर्मांतर टाळण्यासह मुस्लिम संघटनांनी अनुसूचित जातींसोबत आघाडी स्थापन करू नये या हेतूने संघाने दलितांकडे लक्ष केंद्रित केले असावे, असे विश्लेषकांना वाटते.