शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
4
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
5
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
7
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
8
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
9
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
10
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
11
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
12
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
13
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
14
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
15
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
16
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
17
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
18
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
19
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
20
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

दलितांना शस्त्रे नाकारल्याने मुस्लिम आक्रमण यशस्वी

By admin | Updated: April 14, 2016 00:58 IST

मुस्लिमांनी एकेकाळी केलेली आक्रमणे यशस्वी होण्यामागचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले कारण योग्य असल्याचे सांगत रा. स्व. संघाने त्यांच्या

नवी दिल्ली : मुस्लिमांनी एकेकाळी केलेली आक्रमणे यशस्वी होण्यामागचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले कारण योग्य असल्याचे सांगत रा. स्व. संघाने त्यांच्या विचारांशी जवळीक दाखविण्याचे प्रयत्न सुरूच ठेवल्याचे ‘आॅर्गनायझर’ या मुखपत्रातील ताज्या लेखावरून स्पष्ट होते.भारतीय समाजातील बहुतांश घटकांना शस्त्रे बाळगता येत नव्हती. दलितांना नि:शस्त्र ठेवले जात होते. त्यांना रणांगणात लढण्याची परवानगी दिली जात नव्हती, त्यामुळेच त्या काळी विदेशींनी किंवा मुुस्लिमांनी भारतावर केलेली आक्रमणे यशस्वी झाली, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत योग्य असल्याचा दावा साप्ताहिक ‘आॅर्गनायझर’ने नुकत्याच प्रकाशित अंकात केला आहे. अस्पृश्यांना शस्त्रांपासून वंचित ठेवण्यात आले नसते तर या देशावर विदेशी लोकांनी राज्य केले नसते, असे आंबेडकरांचे विधान या लेखात नमूद केले आहे. संपूर्ण देशभरात डॉ. आंबेडकरांची १२५ वी जयंती साजरी केली जात आहे.मुखपृष्ठात सामाजिक योगदानाची दखल...आॅर्गनायझरच्या मुखपृष्ठ लेखात (कव्हर स्टोरी) डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक योगदानाची विस्तृत माहिती दिलेली आहे. ते वंचित आणि कमकुवत घटकांसाठी कसे लढले, याचा तपशीलही त्यात आहे. भारताची लोकशाही आणि राष्ट्रवादाला सामाजिक-आर्थिक आधारावर नवे परिमाण मिळवून देण्यात आंबेडकरांचे योगदान एकमेवाद्वितीय होते. समाजातील तळागाळाच्या घटकांना आत्मसन्मान मिळाल्याखेरीज देश उभा ठाकणार नाही, हे डॉ. आंबेडकरांचे विचार होते, असेही त्यात म्हटले आहे. दलितप्रेमाचे कारण काय?हिंदूंना एकजूट करण्याच्या व्यापक योजनेंतर्गत दलितांना आपल्याकडे ओढत त्यांचे ख्रिश्चनांमध्ये होणारे धर्मांतर टाळण्यासह मुस्लिम संघटनांनी अनुसूचित जातींसोबत आघाडी स्थापन करू नये या हेतूने संघाने दलितांकडे लक्ष केंद्रित केले असावे, असे विश्लेषकांना वाटते.