शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

संगीत अकादमीचे गिरिजादेवींचे स्वप्न अपूर्ण, मोदींना भेटण्याची व्यक्त केली होती इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 04:25 IST

वाराणसी : बनारस या आपल्या जन्मभूमीत जागतिक दर्जाची संगीत अकादमी स्थापन करण्याचे बनारस घराण्याच्या ज्येष्ठ गायिका, ठुमरीसम्राज्ञी गिरिजादेवी यांचे स्वप्न त्यांच्या निधनाने अपूर्ण राहिल्याची खंत काशीवासीयांनी व्यक्त केली.

वाराणसी : बनारस या आपल्या जन्मभूमीत जागतिक दर्जाची संगीत अकादमी स्थापन करण्याचे बनारस घराण्याच्या ज्येष्ठ गायिका, ठुमरीसम्राज्ञी गिरिजादेवी यांचे स्वप्न त्यांच्या निधनाने अपूर्ण राहिल्याची खंत काशीवासीयांनी व्यक्त केली.गिरिजादेवी यांचे बुधवारी रात्री कोलकात्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान व बिरजू महाराज यांच्यानंतर बनारसी संगीतातील तिसरा आणि बहुधा अखेरचा तेजस्वी तारा निखळल्याची भावना शहरातील कलाकार व संगीतप्रेमींनी व्यक्त केली.गिरिजादेवींनी आयुष्यातील उत्तरार्थ कोलकात्यात व्यतीत केले, तरी त्यांचे मन शेवटपर्यंत बनारस या जन्मगावी गुंतलेले होते. बनारसमध्ये जागतिक दर्जाची एक संगीत अकादमी सुरू करावी, अशी माझी इच्छा होती. त्यासाठी जमीन मिळावी, म्हणून मी गेली ५० वर्षे पाठपुरावा करीत होते, परंतु सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. बनारसमध्ये मला अकादमी सुरू करता आली असती, तर कदाचित मी कोलकत्याला गेलेही नसते, असा खेद गिरिजादेवींनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत व्यक्त केला होता. संगीतप्रेमी व सहकलाकारांमध्ये ‘आपाजी’ (मोठी बहीण) या आपुलकीच्या नावाने ओळखल्या जाणा-या गिरिजादेवींनी नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडून येऊन पंतप्रधान झाल्यानंतर, अकादमीच्या संदर्भात त्यांना भेटण्याचीही इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्यांची ती इच्छाही फलद्रूप झाली नाही. (वृत्तसंस्था)>आज वाराणसीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कारगिरिजादेवी यांच्या पार्थिवावर गुरुवारी वाराणसीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होतील व जिल्हा प्रशासनाने त्याची तयारी केली आहे. वास्तव्य कोलकात्यात असले, तरी अंतिम श्वास बाबा भोलेनाथच्या सान्निध्यात घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. गुरुवारी सकाळी त्यांचे पार्थिव विमानाने कोलकात्याहून आणले जाईल व बाबतपूर विमानतळापासून त्यांची अंत्ययात्रा निघेल. या वेळी संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गिरिजादेवी यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून, शहरातील सांस्कृतिक संकुलाला त्यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे.गिरिजादेवींची संगीत अकादमीची इच्छा रास्त होती. बनारसची सांगीतिक आणि सांस्कृतिक परंपरा नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अकादमी नक्कीच गरजेची आहे. गिरिजादेवी हे बनारसचे अनमोल रत्न होते. त्यांच्या हृदयात या शहराविषयी विशेष ममत्व होते.-पं. चन्नू लाल मिश्र,ख्यातनाम शास्त्रीय गायकआपाजी हा बनारसचा सूर होता. त्या केवळ वाराणसीच्याच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या भूषण होत्या. भगवान शंकराची काशी गिरिजेविना जणू सुनीसुनी झाली आहे.- प्रा. रेवती साकळकर, गिरिजादेवींच्या शिष्या व बनारस विद्यापीठातील संगीत अध्यापिका.